शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

२३ जानेवारीला राज्यपाल भवनांवर शेतकरी धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2021 7:07 AM

Farmer Protest: योगेंद्र यादव यांचे आवाहन, शेतकरी कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याने राजपथवर यावे!

- विकास झाडे लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर २६ जानेवारीला राजपथवर शेतकरी मोर्चा काढू. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातून एका सदस्याला पाठवावे, असे आवाहन ‘स्वराज इंडिया’चे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी केले आहे. २३ जानेवारीला प्रत्येक राज्यातील राज्यपालांच्या निवासस्थानावर स्थानिक शेतकऱ्यांनी धडक देण्याचेही आवाहन केले.

या आंदोलनाला शनिवारी ३८ दिवस पूर्ण झाले. तिन्ही कृषी कायदे परत घ्या आणि एमएसपी कायदा लागू करा, यासाठी शेतकरी अडून आहेत. सरकार या मागण्या मान्य करायला तयार नाही. सरकार-शेतकऱ्यांमधील बैठका निष्फळ ठरत आहेत. थंडीने गारठलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रांतिकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी २६ जानेवारी रोजी राजपथवर ट्रॅक्टर मोर्चाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

शेतकऱ्याची आत्महत्याn गाझीपूर सीमेवर आंदोलन करीत असलेल्या ७५ वर्षीय कश्मीर सिंह यांनी उडाणपुलाखालील शौचालयात गळफास लावाला. ते उत्तर प्रदेशातील बिलासपूर येथून आले होते. n कश्मीर सिंह यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सरकार म्हणणे ऐकत नाही, म्हणून मी कठोर निर्णय घेतला आहे. माझा अंत्यसंस्कार दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरच करण्यात यावा. आज मुंबईत बैठकn सिंघू सीमेवर शेतकरी नेत्यांची बैठक झाली असून, हे आंदोलन प्रत्येक राज्यात पोहोचविण्याचा व आंदोलनाबाबत भ्रम निर्माण केला जातोय, तो पत्रकारांपुढे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. n त्यानुसार, काही नेते विविध राज्यांकडे रवाना झाले आहे. रविवारी मुंबईत बैठक होत आहे. शनिवारी पाऊस आल्याने असंख्य शेतकऱ्यांच्या तंबूत पाणी शिरले. 

टॅग्स :Farmerशेतकरी