शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शेतकऱ्यांनी फाडले पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीचे पोस्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 05:47 IST

भाजप सरकारमुळे या शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पंजाबमधील शेतकरी मोदी यांना कदापि माफ करणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

- बलवंत तक्षकलोकमत न्यूज नेटवर्कचंदीगड :  पंजाबमधील  फिरोजपूरमध्ये बुधवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला विरोध करीत शेतकऱ्यांनी भडानावाला गावात पोलिसांनी उभारलेले नाके तोडले.  गावागावात लावण्यात आलेले पंतप्रधान मोदी यांचे  पोस्टर्स फाडले जात आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. आम्ही मोदी यांची रॅली होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकरी नेते जसबीर सिंग जस्सा यांनी सांगितले की,  माछीवाडामध्ये काही  लोक मोदी यांच्या रॅलीचे पोस्टर्स लावत होते. त्यांना रोखण्यात आले.  त्यांनी लावलेले पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीचे पोस्टर्स फाडून फेकले.  आम्ही मोदींची रॅली होऊ देणार नाही. सोबत शिदोरी आणि अंथरुण-पांघरुण घेऊन शेतकरी फिरोजपूरमध्ये दाखल होत आहेत. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी  वर्षभर चाललेल्या आंदोलनादरम्यान ७५० शेेतकरी शहीद झाले. 

भाजप सरकारमुळे या शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पंजाबमधील शेतकरी मोदी यांना कदापि माफ करणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन वर्षांनंतर पंजाबला भेट देत आहेत.  त्यांच्या पंजाब दौऱ्याला काही शेतकरी संघटना विरोध करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर  फिरोजपूर जिल्ह्यात १० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

कृषी कायदे रद्द झाल्यानंतर पंतप्रधानांची आज पहिली रॅली n    केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच रॅली पंजाबमध्ये ५ जानेवारी रोजी होत आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी भाजप कार्यकर्त्यांना उत्साहित करण्यासाठी येत आहेत. n    एक वर्षापेक्षा अधिक काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनामुळे पंजाबमध्ये भाजपची परिस्थिती फार चांगली नाही. n    शिरोमणी अकाली दलापासून वेगळे झाल्यानंतर भाजप प्रथमच विधानसभा निवडणूक लढविणार आहे. मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग ढींढसा उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी