शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शेतकरी ‘डब्ल्यूटीओ’ विरोधात उभे ठाकले; जागतिक व्यापार करारातून कृषी क्षेत्र बाहेर काढण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 10:02 IST

शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ ते ३ यावेळेत ‘डब्ल्यूटीओ छोडो’ आंदोलन आयोजित करण्याची घोषणा केली होती.

अमृतसर/होशियारपूर/हिसार : संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी आपल्या आंदोलनातील नवे शस्त्र बाहेर काढून जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) करारातून कृषी क्षेत्र बाहेर काढा, हा मुद्दा लावून धरला. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी ट्रॅक्टर उभे करून महामार्गांची कोंडी केली. 

शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ ते ३ यावेळेत ‘डब्ल्यूटीओ छोडो’ आंदोलन आयोजित करण्याची घोषणा केली होती. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत न होता ट्रॅक्टर पार्क करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु, पंजाबच्या होशियारपूरमध्ये जालंधर-जम्मू राष्ट्रीय महामार्गासह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांचे ट्रॅक्टर उभे केले. दोआबा किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष जंगवीर सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तांडा येथील ‘बिजली घर’ चौकातही ट्रॅक्टर रस्त्यावर उभे केले. एका मेळाव्याला संबोधित करताना चौहान यांनी ‘डब्ल्यूटीओ’च्या धोरणांवर टीका केली आणि ते शेतकरीविरोधी असल्याचे म्हटले आहे.

किसान युनियन (राजेवाल), बीकेयू (काडियान), बीकेयू (एकता उग्रहण) यासारख्या अनेक शेतकरी संघटनांच्या सदस्यांनी होशियारपूर-फगवाडा रोड, नसराला-तारागड रोड, दोसरका-फतेहपूर रोड, बुल्लोवाल-इलोवाल रोड आणि भुंगा येथे निदर्शने केली.

...म्हणून एमएसपी मिळत नाहीnअमृतसरमध्ये अजनाला, जंदियाला गुरू, रय्या आणि बियास येथे शेतकऱ्यांनी आपली वाहने महामार्गावर उभी केली. लुधियाना-चंडीगड रस्त्यावरही अशीची परिस्थिती होती. हरयाणाच्या हिसारमध्ये शेतकऱ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर ५० ठिकाणी ट्रॅक्टर उभे करून निषेध केला.nडब्ल्यूटीओच्या धोरणांमुळे सरकार सर्व पिकांवर एमएसपी देत नाही, असा दावा अखिल भारतीय किसान सभेचे (एआयकेएस) राज्य उपाध्यक्ष समशेर सिंग नंबरदार यांनी केला. nपश्चिम उत्तर प्रदेशात, भारतीय किसान युनियनने (बीकेयू) केलेल्या आवाहनानंतर ट्रॅक्टरसह शेतकऱ्यांनी निदर्शने केली आणि  प्रातिनिधिक पुतळ्यांचे दहन केले.

...ती आत्महत्या ठरेलशेतकऱ्यांनी कृषी क्षेत्राला डब्ल्यूटीओ करारातून बाहेर काढण्याची मागणी करत ‘डब्ल्यूटीओ’चे  प्रातिनिधिक पुतळे जाळले आणि घोषणाबाजी केली. १३व्या मंत्रिस्तरीय परिषदेसाठी अबूधाबी येथे १६४ डब्ल्यूटीओ सदस्य देशांचे व्यापार मंत्री एकत्र आले असताना निदर्शने करण्यात आली. डब्ल्यूटीओचे उद्दिष्ट शेती अनुदान संपवणे आहे. जर भारताने कृषी आघाडीवर डब्ल्यूटीओच्या धोरणांचे पालन केले तर ती आत्महत्या ठरेल,  असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. 

युरोप महासंघाच्या मुख्यालयाला ट्रॅक्टरने घेरावलालफितीचा कारभार आणि स्वस्त आयातीच्या स्पर्धेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी युरोप महासंघाच्या मुख्यालयाला ट्रॅक्टरसह घेराव घातला. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मुख्यालयाबाहेर काँक्रीट अडथळे आणि काटेरी तारा लावण्यात आल्या आहेत. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिस गस्त घालत होते. येथे २७-राष्ट्रीय गटांचे कृषिमंत्री एकत्र येत आहेत.आंदोलकांनी शेतकरी हळूहळू संपत असल्याचा आरोप केला. ‘लहानपणी तुम्ही शेती करण्याचे स्वप्न पाहतात, आणि प्रौढ झाल्यावर तुम्ही त्यात मरतात,’ अशी प्रतिक्रिया एकाने व्यक्त केली. शेतकऱ्यांनी युरोप महासंघाच्या मुख्यालय इमारतीपासून काहीशे मीटर अंतरावर टायर आणि रबराचे ढिगारे पेटवले. महिन्याच्या सुरुवातीला अशाच प्रकारची हिंसक निदर्शने झाली होती. त्या वेळी युरोप महासंघ नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी गवताच्या गाठी जाळल्या आणि अंडी, फटाके पोलिसांवर फेकले होते. संपूर्ण युरोपमधील शेतकऱ्यांचे निषेध मोर्चे आणि निदर्शनांच्या मालिकेत आता ब्रुसेल्स येथील निदर्शनांची भर पडली आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन