शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

Farmers Protest: शेतकरी आंदोलन सुरू असताना संघ मोदी सरकारच्या मदतीला; २६ जानेवारीला गावोगावी जाणार

By कुणाल गवाणकर | Updated: January 4, 2021 22:31 IST

भारतीय किसान संघाचे १ लाख कार्यकर्ते गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार

नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या सव्वा महिन्यापासून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि सरकारमध्ये होत असलेल्या बैठका निष्फळ ठरल्या आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास २६ जानेवारीला शेतकरी परेड काढणार आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढू शकतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शेतकरी संघटनेनं सरकारनं पुढाकार घेतला आहे. संघाची शेतकरी संघटना गावोगावी जाऊन नव्या कृषी कायद्यांची माहिती शेतकऱ्यांना देणार आहे. नवे कृषी कायदे मागे घेण्याची गरज नाही. मात्र काही बदलांची आवश्यकता असल्याची भूमिका भारतीय किसान संघानं घेतली आहे.शेतकरी आणि सरकारमधील सातवी फेरी देखील निष्फळ; 8 जानेवारीला पुन्हा चर्चाशेतकऱ्यांकडे अद्यापही कृषी कायद्यांबद्दल पूर्ण माहिती नाही. अतिशय कमी शेतकऱ्यांना कायद्यांची कल्पना आहे. त्यामुळे भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते २६ जानेवारीला देशाच्या गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना जागरूक करतील, अशी माहिती भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय आयोजक सचिव असलेल्या दिनेश कुलकर्णी यांनी दिली. किसान संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत याबद्दलचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं.

नव्या कृषी कायद्यांबद्दल आमच्या काय मागण्या आहेत, हे आम्ही गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना सांगू. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, सरकारनं याबद्दलची खात्री द्यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. जे व्यापारी शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करतील, त्यांनी हमीभावापेक्षा कमी किमतीला शेतमाल विकत घेऊ नये. व्यापाऱ्यांचं नोंदणीकरण असायला हवं, या आमच्या मागण्या आहेत, असं कुलकर्णी म्हणाले.
'केंद्र किंवा राज्य स्तरावर पोर्टल तयार करण्यात यावं. यावर व्यापाऱ्यांनी गॅरंटीसह नोंदणी करावी. त्यावरून शेतमाल खरेदी करण्यास आलेला व्यापारी योग्य आहे की नाही, याची माहिती शेतकऱ्यांना मिळेल. प्रत्येक जिल्ह्यात कृषी न्यायालयाची स्थापना व्हावी, यादेखील आमच्या मागण्या आहेत,' असं कुलकर्णींनी सांगितलं. २६ जानेवारीला आमचे १ लाख कार्यकर्ते ५० हजार गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतील, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.

टॅग्स :FarmerशेतकरीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ