शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Farmers protest in Delhi : मोदी आणि शाह म्हणजे दुर्योधन आणि दु:शासन, सीताराम येचुरींची घणाघाती टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 16:10 IST

शेतमालाला दीडपट हमीभाव, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी आज राजधानी नवी दिल्लीत धडकले आहेत.

ठळक मुद्दे शेतमालाला दीडपट हमीभाव, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी आज राजधानी नवी दिल्लीत धडकले आहेत. या शेतकऱ्यांना संबोधित करताना सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केलीमोदी आणि शाह म्हणजे आजच्या काळातील दुर्योधन आणि दु:शासन आहेत, असे येचुरी यांनी म्हटले

नवी दिल्ली -  शेतमालाला दीडपट हमीभाव, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी आज राजधानी नवी दिल्लीत धडकले आहेत. दरम्यान, या शेतकऱ्यांना संबोधित करताना सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मोदी आणि शाह म्हणजे आजच्या काळातील दुर्योधन आणि दु:शासन आहेत, असे येचुरी यांनी म्हटले. तसेच भाजपा आणि संघाकडे निवडणूक जिंकण्यासाठी केवळ राम मंदिराचा मुद्दाच शिल्लक राहिला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. शेतकऱ्यांना संबोधित करताना येचुरी म्हणाले, ''नरेंद्र मोदी आणि आरएसएसकडे आता केवळ राम मंदिर हा एकच मुद्दा उरला आहे. त्यामुळे निवडणूक जवळ आल्यावर त्यांनी राम नामाचा जप सुरू केला आहे."  दरम्यान, राजधानीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गर्दी केली आहे.  यावेळी स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी ''नरेंद्र मोदी, किसान विरोधी'' हा नारा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावा, असे आवाहन केले. देशाच्या कानाकोपऱ्यातून रामलीला मैदानावर आलेले शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा आज संसदेवर धडकणार असून या पार्श्वभूमीवर संसदेच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना, किसान एकता संघटना, भारतीय किसान युनियन अशा 208 संघटनांचे सदस्य शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, सरकार शेतकऱ्यांचे हित पाहत नाही. साखर कारखाने ठरल्याप्रमाणे पैसे देत नाहीत. उत्पादन खर्च वाढला आहे. कृषी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असा आक्रोश शेतकरी संघटनांचा आहे. शेतकऱ्यांच्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी दिल्लीतील डॉक्टर, वकील, प्राध्यापक, कलाकार मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. नेशन फॉर फार्मरच्या सहाशे ते सातशे स्वयंसेवकांनी शेतकऱ्यांना साथ देत रामलीला मैदानाच्या दिशेने पायी कूच केली. यातील काही डॉक्टरांनी शेतकऱ्यांसाठी मैदानावर आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीNew Delhiनवी दिल्लीPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह