शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

फुलशेतीनं बदललं नशीब! एकेकाळी मजूरी करणारा बळीराजा दिवसाला कमावतोय हजारो रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 19:24 IST

सध्या उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील एका शेतकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

नवी दिल्ली : सध्या उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील एका शेतकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. खरं तर चित्रकूट जिल्ह्यात फुलांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांचा चेहरा फुलला आहे. या भागात अर्थात धर्मनगरी चित्रकूटमध्ये फुलांचा खप खूप जास्त आहे. पूर्वी ही फुले इतर जिल्ह्यांतून अथवा राज्यांतून येथे येत असत, मात्र आता येथील शेतकरी स्वतः फुलांची लागवड करून चांगले उत्पन्न घेत आहेत. मात्र, फुलशेती करणारे शेतकरी याआधी परराज्यातून जाऊन मजूरी करायचे. पण आता फुलशेतीने बळीराज्याचे नशीब बदलले आहे. 

दरम्यान, पठारी भागात पीक चांगले येत नव्हते आणि जे काही पीक लावले असायचे ते खराब व्हायचे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी फुलशेती करण्याचा विचार केला आणि आता तो यशस्वी देखील झाला आहे. पूर्वी बाहेरून फुलांची आवक होत असल्याने भाविकांना महागडी फुले खरेदी करावी लागत होती. मात्र, आता चित्रकूट येथील शेतकरी फुलांची लागवड करत आहेत. त्यामुळे भाविकांना कमी पैशात फुले मिळतात. एकीकडे चांगले उत्पन्न मिळाल्याने शेतकरी आनंदी दिसत आहेत, तर दुसरीकडे भाविकांनाही आपल्या कुलदैवताची पूजा करण्यासाठी सहज फुले उपलब्ध होत आहेत. 

शेतकरी म्हणतात... बुंदेलखंड हा अत्यंत मागासलेला भाग असून बुंदेलखंडमध्ये अण्णांची प्रथा अधिक असल्याचे शेतकरी विजय सिंग सांगतात. तसेच इतर पिकांमध्ये खूप अडचण होती, त्यामुळे आम्हाला फुलांची लागवड जास्त सोयीची वाटली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे धार्मिक शहर असल्यामुळे चित्रकूटमध्ये फुलांचा खप जास्त आहे. पूर्वी आम्ही मजूर म्हणून काम करायचो, त्यात आम्हाला काही फायदा दिसत नव्हता. जेव्हापासून आम्ही फुलांची लागवड करायला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही दररोज 5 ते 10 हजार कमावतो, असे स्थानिक शेतकऱ्याने सांगितले. खरं तर शेतकरी विजय सिंग सुमारे तीन एकर फुलांची लागवड करतात. ते सांगतात की, जेव्हापासून त्यांनी फुलांची लागवड करायला सुरुवात केली, तेव्हापासून ते इतर शेतकर्‍यांना फुलांची लागवड करण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशFarmerशेतकरीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी