शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

फुलशेतीनं बदललं नशीब! एकेकाळी मजूरी करणारा बळीराजा दिवसाला कमावतोय हजारो रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 19:24 IST

सध्या उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील एका शेतकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

नवी दिल्ली : सध्या उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील एका शेतकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. खरं तर चित्रकूट जिल्ह्यात फुलांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांचा चेहरा फुलला आहे. या भागात अर्थात धर्मनगरी चित्रकूटमध्ये फुलांचा खप खूप जास्त आहे. पूर्वी ही फुले इतर जिल्ह्यांतून अथवा राज्यांतून येथे येत असत, मात्र आता येथील शेतकरी स्वतः फुलांची लागवड करून चांगले उत्पन्न घेत आहेत. मात्र, फुलशेती करणारे शेतकरी याआधी परराज्यातून जाऊन मजूरी करायचे. पण आता फुलशेतीने बळीराज्याचे नशीब बदलले आहे. 

दरम्यान, पठारी भागात पीक चांगले येत नव्हते आणि जे काही पीक लावले असायचे ते खराब व्हायचे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी फुलशेती करण्याचा विचार केला आणि आता तो यशस्वी देखील झाला आहे. पूर्वी बाहेरून फुलांची आवक होत असल्याने भाविकांना महागडी फुले खरेदी करावी लागत होती. मात्र, आता चित्रकूट येथील शेतकरी फुलांची लागवड करत आहेत. त्यामुळे भाविकांना कमी पैशात फुले मिळतात. एकीकडे चांगले उत्पन्न मिळाल्याने शेतकरी आनंदी दिसत आहेत, तर दुसरीकडे भाविकांनाही आपल्या कुलदैवताची पूजा करण्यासाठी सहज फुले उपलब्ध होत आहेत. 

शेतकरी म्हणतात... बुंदेलखंड हा अत्यंत मागासलेला भाग असून बुंदेलखंडमध्ये अण्णांची प्रथा अधिक असल्याचे शेतकरी विजय सिंग सांगतात. तसेच इतर पिकांमध्ये खूप अडचण होती, त्यामुळे आम्हाला फुलांची लागवड जास्त सोयीची वाटली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे धार्मिक शहर असल्यामुळे चित्रकूटमध्ये फुलांचा खप जास्त आहे. पूर्वी आम्ही मजूर म्हणून काम करायचो, त्यात आम्हाला काही फायदा दिसत नव्हता. जेव्हापासून आम्ही फुलांची लागवड करायला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही दररोज 5 ते 10 हजार कमावतो, असे स्थानिक शेतकऱ्याने सांगितले. खरं तर शेतकरी विजय सिंग सुमारे तीन एकर फुलांची लागवड करतात. ते सांगतात की, जेव्हापासून त्यांनी फुलांची लागवड करायला सुरुवात केली, तेव्हापासून ते इतर शेतकर्‍यांना फुलांची लागवड करण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशFarmerशेतकरीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी