शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचं थैमान! सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
2
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली, मेदांता रुग्णालयात दाखल
3
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीफच्या पथकाला मोठं यश, चकमकीत मारले गेले ८ नक्षलवादी
4
SBI चा ग्राहकांना तगडा झटका, मासिक EMI वाढणार! MCLR च्या दरात 10 बेसिस प्वाइंट्सची वाढ 
5
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
6
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
7
Ganga Dussehra 2024: दहा प्रकारच्या पापातून मुक्ती मिळवण्याचे दहा प्रकार गंगा दशहराच्या मुहूर्तावर करा!
8
संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान
9
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
10
Tarot Card: कामांचा क्रम ठरवून सुरुवात केली तर निश्चितच यश मिळेल; वाचा येत्या आठवड्याचे भविष्य!
11
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
13
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
14
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका
15
मराठी अभिनेत्रीसाठी सचिन तेंडुलकरच्या लेकाची पोस्ट, फोटो शेअर करत अर्जुन म्हणतो...
16
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार
17
ऐश्वर्या नाही तर सलमान खान या अभिनेत्रीसोबत थाटणार होता संसार, कोण आहे ती?
18
अफगाणिस्तान सुपर-८ मध्ये पोहोचला; पण स्टार स्पिनर T20 World Cup मधून बाहेर झाला
19
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
20
फुटबॉलचा Mini World Cup! यजमान जर्मनीची विजयी सलामी; स्कॉटलंडचा दारूण पराभव 

तेलंगणात शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 3:27 PM

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांचे कल्याण आणि कृषी विकास हे राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार केला.

हैदराबाद : शेतकरी कर्जमाफी कार्यक्रम ३ ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांचे कल्याण आणि कृषी विकास हे राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार केला.

अनेक आव्हानांचा सामना करूनही सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे आलेली आर्थिक मंदी, कोरोना महामारीचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, एफआरबीएम निधी न जारी करून तेलंगणा राज्याप्रति केंद्राने दाखविलेली सूडबुद्धीची वृत्ती, यामुळे राज्याची वित्तीय तूट वाढली. परिणामी, शेतकरी कर्जमाफी योजनेला विलंब झाला.  

राज्याची आर्थिक परिस्थिती सदृढ असताना मुख्यमंत्री केसीआर यांनी शेतकरी कर्जमाफी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांवर प्रगती भवन येथे उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत राज्याचे अर्थमंत्री टी. हरीश राव, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार सोमेश कुमार, अर्थ विभागाचे विशेष मुख्य सचिव रामकृष्ण राव, एचएमडीएचे प्रधान सचिव अरविंद कुमार आणि कृषी सचिव रघुनंदन राव यांची उपस्थिती होती.

आणखी १९,००० कोटी रुपयांची आवश्यकता मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, त्यांनी दिलेल्या वचनानुसार सरकार शेतकरी कर्जमाफी योजना राबवत आहे. आधीच माफ केलेल्या कर्जानंतर, प्रलंबित शेती कर्ज माफ करण्यासाठी आणखी १९,००० कोटी रुपयांची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री केसीआर यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावTelanganaतेलंगणाFarmerशेतकरी