शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

कृषी विधेयकं रद्द तरीही आंदोलन मागे न घेण्यावर शेतकरी ठाम; केंद्राला अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 6:48 AM

सरकारशी चर्चेसाठी ५ जणांची समिती, केंद्राला दिली दोन दिवसांची मुदत 

नवी दिल्ली : सर्व मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्याशिवाय कृषी कायद्यांविरोधात गेले वर्षभर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला. शनिवारी सिंघु सीमेवर पार पडलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागण्यांबाबत सरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांनी ५ नेत्यांची समिती गठीत केली आहे. 

शेतमालाला हमीभावाचे संरक्षण, शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणे, आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आदी मागण्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला दोन दिवसांची मुदत दिली आहे. सरकारची स्थिती स्पष्ट केल्यानंतर यावर विचारविनिमय करण्यासाठी शेतकरी ७ डिसेंबर रोजी पुन्हा बैठक घेणार आहेत.

७०२ शेतकऱ्यांची यादी पाठवली केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत सांगितले होते की, आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे नाही. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने आंदोलनात आपला जीव गमावलेल्या ७०२ शेतकऱ्यांच्या नावांची यादी शेतकऱ्यांनी संयुक्त कृषी सचिवांना पाठवून दिली आहे.

nसरकारशी चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये बलबीरसिंह राजेवाल, गुरुनाम चढुनी, युद्धवीर सिंह, शिवकुमार कक्का आणि अशोक ढवळे यांचा समावेश कऱण्यात आला आहे. बैठकीनंतर शेतकरी नेते जोगिंदर सिंह उगराहा म्हणाले की, वीज कायदा २०२०, कृषी कचरा जाळणे, शेतमालाला हमी भावासंदर्भात सरकारकडून अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन