शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

राकेश टिकैत यांचे आवाहन; पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी पीकावरून फिरवला ट्रॅक्टर

By देवेश फडके | Updated: February 25, 2021 10:58 IST

वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) विविध राज्यांत जाऊन किसान महापंचायतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संबोधित करत आहेत. राकेश टिकैत यांनी पीकांचा त्याग करण्यास तयार राहावे, असे आवाहन केले होते. या आवाहनानंतर पंजाब आणि हरियाणामधील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पीकांवर ट्रॅक्टर फिरवून ती नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देराकेश टिकैत यांच्या आवाहनानंतर शेतकरी आक्रमकपंजाब आणि हरियाणामध्ये उभ्या पीकांवरून फिरवला ट्रॅक्टरशेतकऱ्यांना पीके नष्ट न करण्याचे आवाहन

चंदीगड : वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) विविध राज्यांत जाऊन किसान महापंचायतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संबोधित करत आहेत. राकेश टिकैत यांनी पीकांचा त्याग करण्यास तयार राहावे, असे आवाहन केले होते. या आवाहनानंतर पंजाब आणि हरियाणामधील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पीकांवर ट्रॅक्टर फिरवून ती नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (farmers destroy crops as protest against farm laws in punjab haryana)

काही दिवसांपूर्वी हरियाणा येथे किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यासाठीचे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. तसेच हाती आलेल्या पीकांचा त्याग करण्यास तयार राहावे, असे आवाहन राकेश टिकैत यांनी केले होते. राकेश टिकैत यांनी केलेल्या आवाहनानंतर येथील अनेक शेतकऱ्यांनी उभ्या असलेल्या पीकांवर ट्रॅक्टर चालवल्याची माहिती मिळाली आहे. 

आता चार नाही, ४० लाख ट्रॅक्टर येणार; कायदे रद्द न केल्यास संसदेला घेराव: राकेश टिकैत

अंबाला येथे गहूचे पीक नष्ट

अंबाला येथील एका शेतकऱ्याने तयार असलेले गहूचे पीक नष्ट केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर भारतीय किसान युनियनचे नेते गुलाब सिंग घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्यांनी आपली पीके नष्ट करू नयेत. तयार झालेली पीके गरीब किंवा गरजूंना दान करावी, असे गुलाब सिंग यांनी सांगितल्याचे समजते. 

शेतकऱ्यांनी पीके नष्ट करू नयेत

काही शेतकरी आपली तयार पीके नष्ट करत असल्याची माहिती मिळाली. यानंतर शेतकऱ्यांनी आपली पीके नष्ट करू नयेत, असे सांगण्यात आले. त्यांना समजावले गेले. पीके नष्ट करण्याची ही योग्य वेळ नाही, असेही शेतकऱ्यांना सांगितले, असे गुलाब सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

शेतकरी आपल्या पीकांची मुलांप्रमाणे काळजी घेत असतात. असे असताना पीके नष्ट करणे योग्य नाही. आपल्या देशात कुपोषणाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे गरजू व्यक्तींना तयार अन्न-धान्य द्यावे अथवा ते आंदोलनात दान करावे, असे आवाहन गुलाब सिंग यांनी यावेळी केले. दरम्यान, राकेश टिकैत यांनी ही बाब समजल्यावर उभी पीके नष्ट करू नयेत, असे आवाहन त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतPunjabपंजाबHaryanaहरयाणाFarmerशेतकरी