शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मोदी सरकारविरोधात शेतकरी-मजूर रस्त्यावर; विविध मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 11:44 IST

देशभरातील शेतकरी आणि मजूरांचा आंदोलनात सहभाग

नवी दिल्ली: महागाई, किमान भत्ता, कर्जमाफी यांच्यासह विविध मागण्यांसाठी देशातील शेतकरी आणि मजूर रस्त्यावर उतरले आहेत. रामलीला मैदानापासून सुरू झालेला शेतकऱ्यांचा मोर्चा संसद मार्गांपर्यंत पोहोचला आहे. या आंदोलनात देशभरातील शेतकरी आणि मजूरांचा सहभाग आहे. महापूराचा फटका बसलेल्या केरळचे शेतकरीदेखील यामध्ये सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेदिल्लीतील अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली आहे. त्यामुळे काही रस्त्यांवरुन प्रवास न करण्याच्या सूचना दिल्लीतील वाहतूक पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. निवडणुका येतील आणि जातील. मात्र सरकारचं शेतीबद्दलचं धोरण चुकीचं आहे, अशा भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. सरकारनं शेतकरी आणि मजूरांबद्दलची धोरणं बदलायला हवीत, अशी मागणीदेखील आंदोलकांकडून करण्यात येत आहे. ऑल इंडिया किसान महासभेकडून या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं जात आहे. डाव्या संघटनांचा या आंदोलनात सहभाग आहे. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावर सध्या लाखो शेतकरी आणि मजूर पाहायला मिळत आहे. मोदी सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप डाव्या संघटनांनी केला आहे. जास्तीतजास्त शेतकरी आणि मजूरांनी आंदोलनात सहभागी व्हावं, असं आव्हान संघटनांकडून करण्यात आलं आहे. सर्व मजूरांना प्रति महिना किमान 18 हजार रुपये भत्ता, तरुणांना रोजगार, खाद्य वितरण व्यवस्थेत सुधारणा, मजूर कायद्यात बदल, स्वामीनाथन आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत. 

 

टॅग्स :delhiदिल्लीFarmerशेतकरीagitationआंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार