शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मोदी सरकारविरोधात शेतकरी-मजूर रस्त्यावर; विविध मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 11:44 IST

देशभरातील शेतकरी आणि मजूरांचा आंदोलनात सहभाग

नवी दिल्ली: महागाई, किमान भत्ता, कर्जमाफी यांच्यासह विविध मागण्यांसाठी देशातील शेतकरी आणि मजूर रस्त्यावर उतरले आहेत. रामलीला मैदानापासून सुरू झालेला शेतकऱ्यांचा मोर्चा संसद मार्गांपर्यंत पोहोचला आहे. या आंदोलनात देशभरातील शेतकरी आणि मजूरांचा सहभाग आहे. महापूराचा फटका बसलेल्या केरळचे शेतकरीदेखील यामध्ये सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेदिल्लीतील अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली आहे. त्यामुळे काही रस्त्यांवरुन प्रवास न करण्याच्या सूचना दिल्लीतील वाहतूक पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. निवडणुका येतील आणि जातील. मात्र सरकारचं शेतीबद्दलचं धोरण चुकीचं आहे, अशा भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. सरकारनं शेतकरी आणि मजूरांबद्दलची धोरणं बदलायला हवीत, अशी मागणीदेखील आंदोलकांकडून करण्यात येत आहे. ऑल इंडिया किसान महासभेकडून या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं जात आहे. डाव्या संघटनांचा या आंदोलनात सहभाग आहे. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावर सध्या लाखो शेतकरी आणि मजूर पाहायला मिळत आहे. मोदी सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप डाव्या संघटनांनी केला आहे. जास्तीतजास्त शेतकरी आणि मजूरांनी आंदोलनात सहभागी व्हावं, असं आव्हान संघटनांकडून करण्यात आलं आहे. सर्व मजूरांना प्रति महिना किमान 18 हजार रुपये भत्ता, तरुणांना रोजगार, खाद्य वितरण व्यवस्थेत सुधारणा, मजूर कायद्यात बदल, स्वामीनाथन आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत. 

 

टॅग्स :delhiदिल्लीFarmerशेतकरीagitationआंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार