शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारविरोधात शेतकरी-मजूर रस्त्यावर; विविध मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 11:44 IST

देशभरातील शेतकरी आणि मजूरांचा आंदोलनात सहभाग

नवी दिल्ली: महागाई, किमान भत्ता, कर्जमाफी यांच्यासह विविध मागण्यांसाठी देशातील शेतकरी आणि मजूर रस्त्यावर उतरले आहेत. रामलीला मैदानापासून सुरू झालेला शेतकऱ्यांचा मोर्चा संसद मार्गांपर्यंत पोहोचला आहे. या आंदोलनात देशभरातील शेतकरी आणि मजूरांचा सहभाग आहे. महापूराचा फटका बसलेल्या केरळचे शेतकरीदेखील यामध्ये सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेदिल्लीतील अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली आहे. त्यामुळे काही रस्त्यांवरुन प्रवास न करण्याच्या सूचना दिल्लीतील वाहतूक पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. निवडणुका येतील आणि जातील. मात्र सरकारचं शेतीबद्दलचं धोरण चुकीचं आहे, अशा भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. सरकारनं शेतकरी आणि मजूरांबद्दलची धोरणं बदलायला हवीत, अशी मागणीदेखील आंदोलकांकडून करण्यात येत आहे. ऑल इंडिया किसान महासभेकडून या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं जात आहे. डाव्या संघटनांचा या आंदोलनात सहभाग आहे. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावर सध्या लाखो शेतकरी आणि मजूर पाहायला मिळत आहे. मोदी सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप डाव्या संघटनांनी केला आहे. जास्तीतजास्त शेतकरी आणि मजूरांनी आंदोलनात सहभागी व्हावं, असं आव्हान संघटनांकडून करण्यात आलं आहे. सर्व मजूरांना प्रति महिना किमान 18 हजार रुपये भत्ता, तरुणांना रोजगार, खाद्य वितरण व्यवस्थेत सुधारणा, मजूर कायद्यात बदल, स्वामीनाथन आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत. 

 

टॅग्स :delhiदिल्लीFarmerशेतकरीagitationआंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार