शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

आम्हाला तर दिल्लीला जायचंच नाही तर खिळे का ठोकताय?; राकेश टिकैत यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 13:45 IST

६ फेब्रुवारी रोजी जो बंद केला जाणार आहे त्यात जनतेला कोणताही त्रास होणार नाही, टिकैत यांंचं आश्नासन

ठळक मुद्देचक्का जाममध्ये जनतेला कोणताही त्रास होणार नाही, टिकैत यांंचं आश्नासनआंदोलकांना देण्यात येणारा त्रास थांबवला जात नाही तोवर अधिकृत चर्चा नाही, संयुक्त किसान मोर्चाचं वक्तव्य

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या निरनिराळ्या सीमांवर नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीलाही हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या घटनेनंतर सरकारही आंदोलकांचा कठोरपणे सामना करण्याची तयारी करण्याच्या तयारीत दिसत आहे. दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांद्वारे अनेक पावलं उचलण्यात येत आहेत. ६ फेब्रुवारी रोजी आंदोलकांनी चक्का जामचा इशारा दिला आहे. त्यापूर्वी दिल्लीतील निरनिराळ्या सीमांवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग आणि रस्त्यांवर खिळे ठोकण्यात येत आहे. यावरून आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारला प्रश्न केले आहेत. "आम्हाला तो फोन क्रमांक हवाय ज्यापासून आम्ही एका फोनच्याच दुरीवर आहोत. जेव्हा आपण यापूर्वी दिल्लीला जात होतो तेव्हाही रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले होते. आता आम्हाला दिल्लीला जायचंच नाही तर रस्त्यांवर खिळे का ठोकताय," असा सवाल टिकैत यांनी केला आहे. तसंच यामुळे जनतेला नाहक त्रास होईल, असंही ते म्हणाले. "जेवढे जनतेचे रस्ते बंद होतील तितकंच त्यांनाही समजेल की त्यांच्या रस्त्यात कोण खिळे लावण्याचा प्रयत्न करत आहे. हा अन्नदात्याला संदूकीत बंद करण्याचा कट आहे. हे जनतेला आता समजलं आहे. ६ फेब्रुवारी रोजी जो बंद केला जाणार आहे त्यात जनतेला कोणताही त्रास होणार नाही," असं टिकैत यांनी स्पष्ट केलं. यावेळी शेतकऱ्यांच्या महापंचायतीत येणाऱ्या नेत्यांबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. "हा एक मेळावा आहे. या ठिकाणी प्रत्येक जण येत आहे. परंतु या छिकाणी येऊन कोणी मतं मागत नाही. हे आंदोलन तर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंतही जाईल. ४-५ दिवसांत हे प्रकरण सोडवलं गेलं नाही तर हे आंदोलन पूर्ण वर्षभर सुरू राहिल," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. संयुक्त किसान मोर्चाकडूनही भाष्यदिल्लीच्या सीमांवर करण्यात येत असलेल्या प्रवेशबंदीवरून संयुक्त किसान मोर्चानंही भाष्य केलं आहे. "जो पर्यंत आंदोलकांना पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून देण्यात येणारा त्रास थांबवला जात नाही तोवर सरकारसोबत कोणतीही अधिकृत चर्चा केली जाणार नाही. निरनिराळ्या राज्यांमधून होत असलेल्या विरोध आणि वाढत असलेली ताकद यामुळे सर्वजण भयभीत झाले आहेत," असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.   राहुल-प्रियंका गांधींकडूनही टीकाकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सीमांवर पोलिसांद्वारे करण्यात येत असलेल्या तयारीची काही छायाचित्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरू शेअर केली आहे. "भारत सरकार, भिंती उभारू नका, पूल उभारा," असं कॅप्शनही त्यांनी या फोटोंना दिलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीदेखील एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच पंतप्रधान महोदय, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध? असं कॅप्शनही त्यांनी त्याला दिलं आहे.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीPoliceपोलिसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस