शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

आम्हाला तर दिल्लीला जायचंच नाही तर खिळे का ठोकताय?; राकेश टिकैत यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 13:45 IST

६ फेब्रुवारी रोजी जो बंद केला जाणार आहे त्यात जनतेला कोणताही त्रास होणार नाही, टिकैत यांंचं आश्नासन

ठळक मुद्देचक्का जाममध्ये जनतेला कोणताही त्रास होणार नाही, टिकैत यांंचं आश्नासनआंदोलकांना देण्यात येणारा त्रास थांबवला जात नाही तोवर अधिकृत चर्चा नाही, संयुक्त किसान मोर्चाचं वक्तव्य

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या निरनिराळ्या सीमांवर नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीलाही हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या घटनेनंतर सरकारही आंदोलकांचा कठोरपणे सामना करण्याची तयारी करण्याच्या तयारीत दिसत आहे. दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांद्वारे अनेक पावलं उचलण्यात येत आहेत. ६ फेब्रुवारी रोजी आंदोलकांनी चक्का जामचा इशारा दिला आहे. त्यापूर्वी दिल्लीतील निरनिराळ्या सीमांवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग आणि रस्त्यांवर खिळे ठोकण्यात येत आहे. यावरून आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारला प्रश्न केले आहेत. "आम्हाला तो फोन क्रमांक हवाय ज्यापासून आम्ही एका फोनच्याच दुरीवर आहोत. जेव्हा आपण यापूर्वी दिल्लीला जात होतो तेव्हाही रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले होते. आता आम्हाला दिल्लीला जायचंच नाही तर रस्त्यांवर खिळे का ठोकताय," असा सवाल टिकैत यांनी केला आहे. तसंच यामुळे जनतेला नाहक त्रास होईल, असंही ते म्हणाले. "जेवढे जनतेचे रस्ते बंद होतील तितकंच त्यांनाही समजेल की त्यांच्या रस्त्यात कोण खिळे लावण्याचा प्रयत्न करत आहे. हा अन्नदात्याला संदूकीत बंद करण्याचा कट आहे. हे जनतेला आता समजलं आहे. ६ फेब्रुवारी रोजी जो बंद केला जाणार आहे त्यात जनतेला कोणताही त्रास होणार नाही," असं टिकैत यांनी स्पष्ट केलं. यावेळी शेतकऱ्यांच्या महापंचायतीत येणाऱ्या नेत्यांबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. "हा एक मेळावा आहे. या ठिकाणी प्रत्येक जण येत आहे. परंतु या छिकाणी येऊन कोणी मतं मागत नाही. हे आंदोलन तर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंतही जाईल. ४-५ दिवसांत हे प्रकरण सोडवलं गेलं नाही तर हे आंदोलन पूर्ण वर्षभर सुरू राहिल," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. संयुक्त किसान मोर्चाकडूनही भाष्यदिल्लीच्या सीमांवर करण्यात येत असलेल्या प्रवेशबंदीवरून संयुक्त किसान मोर्चानंही भाष्य केलं आहे. "जो पर्यंत आंदोलकांना पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून देण्यात येणारा त्रास थांबवला जात नाही तोवर सरकारसोबत कोणतीही अधिकृत चर्चा केली जाणार नाही. निरनिराळ्या राज्यांमधून होत असलेल्या विरोध आणि वाढत असलेली ताकद यामुळे सर्वजण भयभीत झाले आहेत," असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.   राहुल-प्रियंका गांधींकडूनही टीकाकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सीमांवर पोलिसांद्वारे करण्यात येत असलेल्या तयारीची काही छायाचित्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरू शेअर केली आहे. "भारत सरकार, भिंती उभारू नका, पूल उभारा," असं कॅप्शनही त्यांनी या फोटोंना दिलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीदेखील एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच पंतप्रधान महोदय, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध? असं कॅप्शनही त्यांनी त्याला दिलं आहे.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीPoliceपोलिसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस