शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पाच महिने, 1500 किमी प्रवास; शेतकऱ्याची हरविलेल्या मुलासाठी सायकलवरून शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 14:21 IST

हथरस जिल्ह्यात राहणारे सतिश चंद हे 48 वर्षीय शेतकरी आपल्या मुलाचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्दे हथरस जिल्ह्यात राहणारे सतिश चंद हे 48 वर्षीय शेतकरी आपल्या मुलाचा शोध घेत आहेत.सहा महिन्यापूर्वी सतिश यांचा अकरा वर्षीय दिव्यांग मुलगा अचानक बेपत्ता झाला आहे.

आगरा- हथरस जिल्ह्यात राहणारे सतिश चंद हे 48 वर्षीय शेतकरी आपल्या मुलाचा शोध घेत आहेत. सहा महिन्यापूर्वी सतिश यांचा अकरा वर्षीय दिव्यांग मुलगा अचानक बेपत्ता झाला आहे. त्या मुलाला शोधण्यासाठी सतिश यांनी सायकलवरून शोधमोहीम सुरू केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची मदत न घेता अजूनही सतिश यांची ही शोधमोहीम सुरू आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

चंद यांनी दिल्ली आणि हरियाणातील विविध भागात सायकलीवर जाऊन मुलाचा शोध घेतला. अजूनही विविध भागात त्यांचा सायकलीवरून प्रवास सुरू आहे. आम्ही हथरस जिल्ह्यातील द्वारकापूर या गावातील राहणारे आहोत. 24 जून रोजी गोडना हा माझा मुलागा शाळेत जाण्यासाठी घरातून निघाला. शाळा घरापासून एक किलोमीटर दूर आहे. शाळेत गेलेला मुलगा संध्याकाळी घरी आला नाही. म्हणून मी त्याला शोधण्यासाठी शाळेत गेलो पण तो तेथे नव्हता. सस्नी रेल्वे स्टेशनच्या जवळ गोडनाला पाहिलं असल्याचं त्याच्या वर्गमित्रांनी सांगितलं.मी तेथेही जाऊन पाहिलं पण मला तो दिसला नाही.  चार दिवस मी स्वतः त्याचा शोध घेतल्यानंतर शेवटी 28 जून रोजी पोलीस स्टेशन गाठलं. पण तेथे गेल्यावर पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घ्यायला नकार दिला. माझ्या सततच्या विनंती नंतर त्यांनी तक्रार नोंदवून घेतली व मला जाण्यास सांगितलं. पण मला स्वस्थ बसवत नसल्याने मी माझी सायकल काढून मुलाचा शोध सुरू केला. रस्त्याने जाताना प्रत्येकाला मुलाचा फोटो दाखवून मुलाबद्दलची विचारणा केली. माझ्याकडे पैसे कमी आहेत तसंच योग्य सोयी नाहीत. त्यामुळे मदत कोण करणार ? हा मोठा प्रश्न आहे. 

चंद यांनी आत्तापर्यंत सायकलवरून 1500 किमीचा प्रवास केला आहे. दिल्लीपासून ते कानपूरपर्यंत आणि हरियाणातील रेवारीमध्ये त्यांनी मुलाला शोधलं. पण अजून त्यांच्या हाती काहीही लागलं नाही. आत्तापर्यंत 100 गावं पालथी घातली आणि मुलाचा फोटो हजारापेक्षा जास्त स्थानिकांना दाखविला, असं सतिश चंद म्हणाले आहेत. इतमादपूरमध्ये असलेल्या बरहान गावातील काही नागरिकांनी एका व्यक्तीला हातात मुलाचा फोटो घेऊन सायकलवरून जाताना पाहिलं होतं. सतिश चंद यांची ही कहाणी आगऱ्यातील एका बाल हक्क कार्यकर्ते नरेश पारस यांच्याकडे पोहचली. चंद यांची तक्रार नरेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून यूपी पोलिसांच्या लक्षात आणून दिली. यानंतर चंद यांच्या तक्रारीसाठी उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुलाच्या शोधासाठी आदेश दिले. 

मुलाला शोधण्यासाठी या पद्धतीचा का अवलंब केला असा प्रश्न लोक मला विचारत आहेत. पण मुलाला गमावण्याचं दुःख त्यांना समजत नाहीये. माझी पत्नी अजूनही मुलाच्या प्रतिक्षेत आहे. 2005मध्ये आजारपणाने आमच्या मोठ्या मुलीचं निधन झालं. त्यानंतर 2011मध्ये एका अपघातात आमच्या नऊ वर्षाच्या मुलाचं निधन झालं. आता गोडना हा एकुलता एक आसरा होता. त्यामुळे त्याच्याशिवाय कसं जगायचं? हा प्रश्न आम्हाला सतावतो आहे, अशी भावना सतिश चंद यांनी व्यक्त केली आहे. 

चंद यांनी काही जिल्ह्यामध्ये मुलगा हरविल्याची पत्रकं दिली आहेत. तसंच तेथिल चहा विक्रेत, रेल्वे स्टेशन, बस स्टॉपच्या बाजूला असणाऱ्या दुकानदारांचे नंबर घेतले आहेत. मुलगा सापडल्याचा फोन कोणीतरी करेलच याची अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.