शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभच मिळेना, गुजरातमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

By महेश गलांडे | Published: January 05, 2021 3:34 PM

आश्चर्य म्हणजे आत्महत्येपूर्वी काही तास अगोदर बलवंतसिंह यांनी आपल्या घरातून बाकोर पोलीस ठाण्यातील कार्यालयात फोन केला होता. त्यावेळी, सरकारी कर्मचारी आपलं काम करत नाहीत, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं.

ठळक मुद्देगुजरातमधील एक शेतकरी, शेतकरी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात, पंचायत समितीत चकरा मारत होता. मात्र, सातत्याने पाठपुराव करुनही, खेटे मारुनही योजनेचा लाभ, रक्कम मिळाली नसल्याने पीडित शेतकऱ्याने पंचायत समिती कार्यालयातच स्वत:ला फासावर लटकवले

सुरत - देशात केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकांना विरोध करत पंजाब आणि हरयाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमारेषेवर उतरले आहेत. गेल्या महिनाभरापासून कडाक्याच्या थंडीतही त्यांचं आंदोलन सुरूच आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लागत नाही, तर दुसरीकडे गुजरातमध्ये एका शेतकऱ्याने सरकारी कार्यालयातील अनास्थेमुळे आत्महत्या केली आहे. 

गुजरातमधील एक शेतकरी, शेतकरी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात, पंचायत समितीत चकरा मारत होता. मात्र, सातत्याने पाठपुराव करुनही, खेटे मारुनही योजनेचा लाभ, रक्कम मिळाली नसल्याने पीडित शेतकऱ्याने पंचायत समिती कार्यालयातच स्वत:ला फासावर लटकवले. गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील ही ह्रदयद्रावक आणि सरकारी कार्यालयाची लख्तरे वेशीवर टांगणारी घटना आहे. येथील बांकोर गावचे शेतकरी बलवंत सिंह यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातच फाशी घेऊन आपली जीव दिला. या शेतकऱ्याने एक सुसाईड नोटही लिहिली होती. त्यामध्ये, आजही माझ्या अंतर्मनात बीजेपीच आहे, पण या गरीब शेतकऱ्याचं काम कुणीच केलं नाही, असे बलवंतसिंह यांनी लिहिलं आहे. 

आश्चर्य म्हणजे आत्महत्येपूर्वी काही तास अगोदर बलवंतसिंह यांनी आपल्या घरातून बाकोर पोलीस ठाण्यातील कार्यालयात फोन केला होता. त्यावेळी, सरकारी कर्मचारी आपलं काम करत नाहीत, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, पोलिसांनीही त्याची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे, बलवंतसिंह यांनी टोकाचे पाऊल उचलले. बलवंत सिंह यांचा मुलगा राजेंद्र भाईने माहिती देताना, वडिलांचं घराचं स्वप्न पूर्ण न झाल्याचं सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत नाव आलं होतं. पण, ग्रामपंयातीकडून त्यांना आर्थिक मदत मिळालीच नाही. त्यामुळे, वडिलांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असे राजेंद्र भाई यांनी सांगितलंय.  

टॅग्स :GujaratगुजरातSuicideआत्महत्याFarmerशेतकरीPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना