शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
3
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
4
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
5
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
6
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
7
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
8
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
9
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
10
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
11
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
12
नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा माहिकासोबत साखरपुडा? अभिनेत्रीच्या हातात दिसली अंगठी
13
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 
14
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
15
"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रोसमोर घेतली उडी
16
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
17
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
18
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
19
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
20
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायदे रातोरात आणलेले नाहीत; गेली २०-२२ वर्षे त्यावर व्यापक चर्चा झालीय- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 06:48 IST

एमएसपी कायम राहील अशी ग्वाही

भोपाळ : तिन्ही कृषी सुधारणा कायदे रातोरात आणले गेलेले नाहीत, मागील २०-२२ वर्षांत प्रत्येक सरकारने त्यावर व्यापक चर्चा केली आहे, तसेच कमी-अधिक प्रमाणात सर्वच संघटनांनी यावर विचारविमर्श केलेला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. कृषी मालाची ‘किमान आधारभूत किंमत’ (एमएसपी) कायम ठेवली जाईल, तसेच शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान सरकार होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही मोदी यांनी दिली.तीन कृषी कायद्यांच्या विरोधात हजारो शेतकरी २३ दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. हे तिन्ही कायदे रद्द करण्याची एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी या कायद्यांचे जोरदार समर्थन केले आहे.मोदी यांनी सांगितले की, शेतकरी, शेतकऱ्यांच्या संघटना, शेतीतज्ज्ञ अशा सर्वांकडून कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. सर्वच राजकीय पक्षांनी घोषणापत्रांत या सुधारणांबाबत आश्वासन दिलेले आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांनी काहीच केले नाही. शेतकऱ्यांना भावनिक आवाहन पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले. त्यांनी म्हटले की, आम्ही शेतकऱ्यांना ‘अन्नदाता’ समजतो. आम्ही शेतकऱ्यांचे कदापि नुकसान होऊ देणार नाही.  मी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो की, या नव्या कायद्याचे सगळे श्रेय तुम्ही घ्या. मला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करायचे आहेत. मला त्यांची प्रगती करायची आहे. कृषी क्षेत्रात आधुनिकता आणायची आहे.‘हा तर अपप्रचार’मोदी यांनी म्हटले की, आम्ही स्वामीनाथन आयोगाचा अहवाल फायलींच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढून लागू केला. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट एमएसपी दिली. एमएसपी यापुढेही चालूच राहील. एमएसपी बंद केली जाईल, या प्रचारावर कोणीही शहाणी व्यक्ती विश्वास ठेवू शकणार नाही. यापेक्षा मोठे खोटे कोणतेच असू शकत नाही.विरोधकांचे प्रेम ढोंगी !मोदी यांनी म्हटले की, विरोधी पक्षांचे शेतकरीप्रेम ढोंगी आहे. ते केवळ राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर करीत आहेत. त्यांनी स्वामीनाथन समितीचा अहवाल आठ वर्षे दाबून ठेवला. प्रत्येक निवडणुकीआधी हे लोक कर्जमाफीच्या बाता मारत राहिले; पण कर्जमाफी किती होते? यात सर्व शेतकरी येतात का? बँकेकडून कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे काय? अशा प्रश्नांचा त्यांनी कधीच विचार केला नाही. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी