शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

पर्वतावर उपाशीपोटी अडकले होते कुटुंब, लष्कराने २४ तास चढाई करत पोहोचवले भोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 17:21 IST

Indian Army News: भारतीय लष्कराचे जवान हे संकटसमयी देशातील सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी सदैव तयार असतात. याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला.

श्रीनगर - भारतीय लष्कराचे जवान हे संकटसमयी देशातील सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी सदैव तयार असतात. याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. (Indian Army News) जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांनी २४ तासांत ११ हजार फूट चढाई करत नागिनसूर पर्वत क्षेत्रात हिमवृष्टीमुळे अडकलेल्या.बकरवाल समुदायातील एका कुटुंबाला भोजन आणि मदत पोहोचवली. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने आज याबाबतची माहिती दिली आहे. (Indian Army provided relief to a Bakarwal family which was stranded in snow with shortage of food in the 11000 ft high Naginsur ridge)

लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, बशीर अहमद हे त्यांची पत्नी, तीन मुले आणि पाळीव प्राण्यांसह कथुआ येथून मारवाह पर्वतामधील नवापंछीच्या मार्गावर होते. हा समुदाय बर्फवृष्टीमुळे अन्नपदार्थ आणि प्राण्यांना चारा मिळावा यासाठी चाऱ्याच्या शोधात जातो. 

छतरू विभागात लष्कराच्या गुज्जर बकरवाल चौकीला फोन करून अहमदने मदतीची मागणी केली. त्यानंतर चिनगाम चौकीमधून बचाव पथक त्वरित रवाना झाले. त्यांनी सांगितले की, खराब हवामानादरम्यान सुमारे २४ तास चढाई करत जवान घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर या कुटुंबाचा शोध घेत त्यांना भोजन, औषधे आणि आवश्यक सामुग्री पोहोचवली. 

लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, बकरवाल कुटुंबातील सदस्यांनी या मदतीसाठी लष्कराचे आभार मानले आहेत. तसेच दरवर्षी त्यांच्याकडील जनावरांचे कळप मारवाह पर्वतावर जाते. तसेच जेव्हा गरज भासते तेव्हा लष्कर मदतीसाठी धावून येते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत