भीमा कोरेगाव प्रकरण नियंत्रणात आणण्यास राज्य सरकारला अपयश - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 04:08 PM2018-01-04T16:08:30+5:302018-01-04T16:10:14+5:30

पुण्यातील भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर आता संसदेतही विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.

Failure of the State Government to control Bhima Koregaon issue - Sharad Pawar | भीमा कोरेगाव प्रकरण नियंत्रणात आणण्यास राज्य सरकारला अपयश - शरद पवार

भीमा कोरेगाव प्रकरण नियंत्रणात आणण्यास राज्य सरकारला अपयश - शरद पवार

googlenewsNext

नवी दिल्ली : पुण्यातील भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर आता संसदेतही विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. संसदेतील राज्यसभेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक निवेदन सादर करून भीमा कोरेगाव प्रकरणी राज्य सरकारच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
गेल्या दोनशे वर्षात जे घडले नाही ते भीमा कोरेगावमध्ये घडले. भीमा कोरेगाव प्रकरण नियंत्रणात आणण्यास राज्य सरकारला अपयश आले. याप्रकरणी राज्य सरकारने अधिक लक्ष द्यायला हवे होते, असे शरद पवारांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात लवकरात लवकर शांतता नांदावी यासाठी सर्वपक्षीयांनी सहकार्य करावे, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे.
शरद पवार यांच्यासह नरेश अग्रवाल, डी. राजा, कनिमोझी, संजय राऊत, अमर साबळे, संभाजी राजे छत्रपती, व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. रामदास आठवले यावेळेस बोलताना म्हणाले, ही अत्यंत निंदनीय घटना असून याचा सर्व पक्षांनी आपली राजकीय भूमिका सोडून निषेध केला पाहिजे. दरवर्षी दलितांवर हल्ले होण्याच्या 45 हजार घटना घडतात. सर्व सरकारच्या काळामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही एका पक्षाच्या सरकारला यासाठी दोषी धरता येणार नाही. यासाठी दोषी असणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे.




रामदास आठवले यांच्यानंतर राष्ट्रपती नियुक्त सदस्य संभाजी राजे छत्रपती यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण छत्रपती घराण्याचे वंशज आहोत, कृपया मला मराठीतूनही निवेदन करु द्या अशी विनंती करुन त्यांनी आपले मत मांडले. आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्ना ज्योतिबा फुले यांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी अठरापगड जाती आणि बहुजन समाजाला एकत्रित भूमिका सर्वांनी घेतली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शांतता राखावी" अशा आशयाचे निवेदन त्यांनी केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करत, राज्य सरकारने अत्यंत संयमाने भूमिका घेतल्याचे सभागृहाला सांगितले. राज्यातील परिस्थिती आणखी बिघडली असती मात्र राज्य सरकारने जे केले ते ठिक केले असे राऊत यांनी सांगितले. भीमा-कोरेगाव लढाईच्या मुद्द्यावर काही लोक वारंवार याबाबत हिंदुत्त्ववादी संघटनांकडे बोट दाखवत आहेत पण पेशव्यांचा आरएसएस आणि हिंदू एकता संघटनेशी नव्हता. येथे जे झाले त्यामागे कोणीतरी अदृश्य शक्ती कार्यरत होती त्या अदृश्य हातांना शोधण्याचं काम केलं पाहिजे.



 

Web Title: Failure of the State Government to control Bhima Koregaon issue - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.