शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नेहरुंमुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; जाणून घ्या मोदींचा दावा खरा की खोटा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 13:13 IST

नेहरुंमुळे हजारो लोक चेंगराचेंगरीत मारले गेल्याचा मोदींचा दावा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणांमधून अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी 1954 मध्ये कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीला माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना जबाबदार धरलं. उत्तर प्रदेशातल्या कौशांबीत एका जनसभेला संबोधित करताना त्यांनी हा दावा केला. व्यवस्थापनातील त्रुटींमुळे त्यावेळी हजारो लोकांचे प्राण गेले. मात्र कोणालाही एका रुपयाचीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. उलट याबद्दलच्या बातम्या काँग्रेसकडून दाबण्यात आल्या, असा दावा करत मोदींनी नेहरुंवर शरसंधान साधलं. पंतप्रधान मोदींच्या आरोपांनंतर खरंच त्या घटनेला नेहरु जबाबदार होते का, त्यावेळी काँग्रेसनं ही बातमी दाबली होती का, असे सवाल उपस्थित झाले. 1954 मध्ये भारतात टीव्ही नव्हते. त्यामुळे लोक माहितीसाठी वर्तमानपत्रांवर आणि रेडिओवर अवलंबून होते. काही वरिष्ठ पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, त्या चेंगराचेंगरीसाठी नेहरुंना जबाबदार धरता येणार नाही. आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पत्रकारांनी दोन गोष्टींकडे लक्ष वेधलं. ज्या दिवशी चेंगराचेंगरी झाली, त्यावेळी नेहरु तिथे उपस्थितच नव्हते. याशिवाय त्या काळी आजच्या सारखं तंत्रज्ञान नसल्यानं गर्दीवर नियंत्रण मिळवणं कठीण होतं. 

चेंगराचेंगरीला नेहरु जबाबदार?वरिष्ठ पत्रकार पीयूष बबेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्यात 3 फेब्रुवारी 1954 रोजी चेंगराचेंगरी झाली. पंडित नेहरु या दिवशी कुंभमेळ्याला आले नव्हते. ते 2 फेब्रुवारीला कुंभमेळ्यात स्नान करुन परतले होते. त्यांनी कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर ते पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी रवाना झाले. आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पीयूष बबेले यांनी नेहरु वाड्मयाच्या 25 व्या खंडाचा आणि नेहरुंच्या संसदेतल्या भाषणाचा संदर्भ दिला. चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी नेहरुंनी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी मृतांबद्दल संवेदना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहिलं होतं. प्रयागराजमधले वरिष्ठ पत्रकार नरेश मिश्र यांनीदेखील नेहरु चेंगराचेंगरीच्या दिवशी नव्हे, तर त्याच्या एक दिवस आधी कुंभमेळ्यात सहभागी झाल्याचं सांगितलं. 3 फेब्रुवारीला राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद कुंभमेळ्याला उपस्थित होते. ते किल्ल्याच्या बुरुजावरुन कुंभमेळा पाहत असताना संन्याशांचा मोठा जमाव तिथे आला. त्याचवेळी दोन पेशवाई मिरवणुका तिथून जाऊ लागल्या आणि चेंगराचेंगरी झाली, असं मिश्र म्हणाले.काँग्रेसनं बातमी दाबली?कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीचे साक्षीदार असलेल्या नरेश मिश्र यांनी तिथल्या भीतीदायक परिस्थितीचं वर्णन केलं. 'जवळपास 45 मिनिटं चेंगराचेंगरी सुरू होती. परिस्थितीवर कोणाचंच नियंत्रण नव्हतं. 45 मिनिटांनंतर परिस्थिती निवळली. मात्र तोपर्यंत 700-800 जणांचा मृत्यू झाला होता. हा आकडा सरकारी होता. त्यामुळे खरा आकडा हजारपेक्षा अधिक असण्याची शक्यता असू शकेल,' असं मिश्र यांनी सांगितलं. पुढील अनेक महिने या चेंगराचेंगरीची चर्चा झाली आणि त्यावेळच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत याबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.   

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूNarendra Modiनरेंद्र मोदीKumbh Melaकुंभ मेळा