शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

यूपीए सरकार हटवण्याच्या कटात फेसबुक भाजपसोबत! काँग्रेसने केला हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 12:48 IST

लोकशाहीची चेष्टा होऊ देणार नाही

ठळक मुद्देदेशाच्या राजकारणातील फेसबुकच्या भूमिकेवरून निर्माण झालेल्या वादाने घेतले नवेच वळण षड्यंत्र रचण्यात फेसबुकचे साह्य घेतले जात होते...

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला सत्तेतून दूर करण्याच्या कारस्थानात फेसबुक भाजपसोबत हातमिळवणी करून काम करीत होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे. देशाच्या राजकारणातील फेसबुकच्या भूमिकेवरून निर्माण झालेल्या वादाने मंगळवारी नवेच वळण घेतले. त्याचे कारण होते, तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) सरकारमधील माहिती व तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांच्या विरोधी पक्षांसोबत होणाऱ्या गोपनीय बैठकांशी संबंधित दस्तावेज सार्वजनिक होणे. या दस्तावेजांच्या आधारावर काँग्रेसने आपले जोरदार हल्ले करताना आरोप केला की, यूपीए सरकारला सत्तेतून दूर करण्याच्या कारस्थानात फेसबुक भाजपसोबत हातमिळवणी करून काम करीत होता. हा दस्तावेज सार्वजनिक होताच राहुल गांधी यांनी ट्विट केले की, पक्षपात, खोट्या बातम्या आणि द्वेषाने भरलेल्या गोष्टींशी आम्ही कठीण संघर्ष करून लोकशाहीची चेष्टा होऊ देणार नाही. वॉल स्ट्रीट जर्नलने खुलासा केला की, फेसबुक या प्रकारचे असत्य आणि द्वेष पसरविण्याचे काम करीत आले आहे आणि त्याबद्दल सगळ्या भारतीयांनी प्रश्न विचारला पाहिजे. राहुल गांधी यांनी त्यांच्या टष्ट्वीटसोबत पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी मार्क झुकेरबर्ग यांना लिहिलेले तीन पानी पत्रही दिले आहे.

षड्यंत्र रचण्यात फेसबुकचे साह्य घेतले जात होते...

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी असाच दस्तावेज सार्वजनिक केला आणि सिद्ध केले की, आंखी दास गुगल आणि यंग इंडियाच्या धोरण ठरवणाऱ्यांसोबत बोलत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खुलासा. ‘आम्ही लोक दिवंगत अरुण जेटलीजींबाबत लिहितो आहोत. त्यावेळी जेटली विरोधी पक्षात होते. जी चिठ्ठी जेटली सरकारला लिहीत होते ती आम्ही ड्राफ्ट केली आहे.’ 

फेसबुक अरुण जेटलीजी यांचे म्हणणे भाजपचे एका वरिष्ठ नेत्याचे. ते एक विरोधी पक्षनेते होते. संसदेत त्यांची चिठ्ठी ड्राफ्ट कोण करीत होते, तर आंखी दास. फेसबुक करीत होता. का? विरोधी पक्ष कोणत्या मुद्यावर काय बोलेल, सरकारला काय लिहिणार, कसे घेरणार याचे षड्यंत्र रचण्यात त्यांचे साह्य घेतले जात होते, असे खेडा विचारतात. 

खेडा यांनी असे अनेक खुलासे केले. त्यातून हे सिद्ध होत होते की, फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅपची भारतातील शाखा भाजपशी हातमिळवणी करून मनमोहनसिंग सरकारला सत्तेतून हटविण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्याच्या षड्यंत्राचा भाग होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाElectionनिवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी