शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मेसेज फॉरवर्डिंगवर फेसबुकचीही मर्यादा, एकाच वेळी पाच जणांना मेसेज पाठवता येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 04:01 IST

खोट्या बातम्या, द्वेषपूर्ण आणि नुकसानकारक माहितीच्या प्रसारास पायबंद घालण्यासाठी फेसबुकने ही मर्यादा घातली आहे. व्हॉटस्अ‍ॅपच्या धर्तीवरच फेसबुकने फॉरवर्ड मेसेजची संख्या मर्यादित केली आहे.

नवी दिल्ली : संदेश अग्रेषित (फॉरवर्र्डिंग मेसेज) करण्याच्या संख्येवर फेसबुकने मर्यादा घातली असून आता एकाचे वळी पाच जणांना किंवा ग्रुपला मेसेज पाठविता येईल. मेसेज फॉरवर्ड करण्याची संख्या मर्यादित करण्यात आल्याने चुकीच्या माहितीचा प्रसार होण्यास आळा बसेल आणि वास्तव जगात कमी नुकसान होईल, असे फेसबुकने म्हटले आहे.खोट्या बातम्या, द्वेषपूर्ण आणि नुकसानकारक माहितीच्या प्रसारास पायबंद घालण्यासाठी फेसबुकने ही मर्यादा घातली आहे. व्हॉटस्अ‍ॅपच्या धर्तीवरच फेसबुकने फॉरवर्ड मेसेजची संख्या मर्यादित केली आहे. यामुळे एखादा मेसेज एकाच वेळी मर्यादित लोकांनाच पाठविता येईल. या नवीन सुविधेची चाचणी फेसबुकने मार्चपासून सुरू केली होती. २४ सप्टेंबरपासून जगभर ही सुविधा लागू केली जाईल. यामुळे आॅनलाईन वावरताना लोक सुरक्षित राहतील, असा विश्वास फेसबुकने व्यक्त केला आहे.लोकांना सुरक्षितता आणि खाजगी मेसेजचा अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग म्हणून ही नवीन पद्धत सुरू करीत आहोत. चुकीची आणि नुकसानकारक माहिती, संदेशाच्या प्रसाराला आळा घालण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे, असे फेसबुकने म्हटले आहे.या वर्षाच्या सुरुवातीपासूनच फेसबुकने अवांछित संदेश रोखणे आणि त्याबाबत सुरक्षेच्या दृष्टीने सूचित करणारी पद्धत सुरू केली होती.

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया