शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाच्या टोलनाक्यासाठी अतिरिक्त भूसंपादन टळले

By admin | Updated: March 14, 2016 00:10 IST

नशिराबाद- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत जिल्‘ात महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाच प्रक्रीया सुरू आहे. चौपदरीकरणाव्यतिरिक्त नशिराबाद येथे प्रास्तावित टोल नाक्यासाठी शेतकर्‍यांची होणारे अतिरिक्त भूसंपादन स्थानीक शेतकरी राजकीय पदाधिकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे टळले आहे. करोडो रुपयांची शेतजमीन व जीवंत विहिरी बचावल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

नशिराबाद- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत जिल्‘ात महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाच प्रक्रीया सुरू आहे. चौपदरीकरणाव्यतिरिक्त नशिराबाद येथे प्रास्तावित टोल नाक्यासाठी शेतकर्‍यांची होणारे अतिरिक्त भूसंपादन स्थानीक शेतकरी राजकीय पदाधिकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे टळले आहे. करोडो रुपयांची शेतजमीन व जीवंत विहिरी बचावल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान टोलनाक्यासाठीचे जास्तीचे१२६ मीटर रुंदीचे भूसंपादन न करता उपलब्ध ६० मीटर जागेतच झिकझॅक पद्धतीच्या टोलनाक्याची निर्मिती करण्यात यावी, असे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधकिरणाकडून भूसंपादन अधिकारी जळगाव यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
महामार्ग चौपदरीकरणा व्यतिरिक्त केवळ टोलनाक्यासाठी नशिराबादसह परिसरातील सुमारे २० एकर अतिरिक्त जमीनी संपादीत करण्याचा प्रयत्न महामार्गविभागाचा होता. त्यात करोडो रुपयांची शेतजमीनीसह सुमारे आठ जीवंत विहिरी नष्ट होणार होत्या. ही बाब माजी खासदार वाय.जी.महाजन, प्रगतीशील शेतकरी तथा भाजप शहराध्यक्ष लालचंद पाटील, गणपत सोमा पाटील, पराग रोटे, संजय चौधरी, दिलीप पाटील, सुपडू महाजन, अरुण नेमाडे, राजेंद्र पाचपांडे, भाजप पदाधिकार्‍यांसह शेकडो शेतकर्‍यांनी लक्षात घेता टोलनाक्यासाठीच्या अतिरिक्त भूसंपादनाला विरोध केला. यासंदर्भात पालकमंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.पाटील यांच्याकडे टोलनाक्याच्या अतिरिक्त भूसंपादनामुळे (कारण टोलनाका ठराविक काळानंतर संपुष्टात येतो व जमीन तशीच पडून राहिली असती) शेतकरी आयुष्यभर आर्थिक अडचणीत येणार होता. याबाबत त्यांना गार्‍हाणे मांडून निवेदन दिली. त्यांनी याबाबत सहानुभुतीपूर्वक पाठपुरावा करुन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना शेतकरीवर्गाची कैफीयत सांगितली. मंत्री नितीन गडकरी याबाबत दखल घेत केवळ केवळ टोलनाक्यासाठी अतिरिक्त भूसंपादन न करण्याचे आदेश काढले आहे. आहे त्याच जागेत झिकझॅक पद्धतीने नवीन टोलनाका उभारावा असे सांगितले. त्यामुळे शेतजमिनी व विहीरी वाचल्याने शेतकरीवर्ग आनंद व्यक्त करीत आहे. भाजपच्या व शेतकर्‍यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.