शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
4
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
5
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
6
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
7
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
8
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
9
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
10
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
11
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
12
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
13
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
14
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
15
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
16
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
17
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
18
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
19
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
20
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...

चौपदरीकरणाच्या टोलनाक्यासाठी अतिरिक्त भूसंपादन टळले

By admin | Updated: March 14, 2016 00:10 IST

नशिराबाद- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत जिल्‘ात महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाच प्रक्रीया सुरू आहे. चौपदरीकरणाव्यतिरिक्त नशिराबाद येथे प्रास्तावित टोल नाक्यासाठी शेतकर्‍यांची होणारे अतिरिक्त भूसंपादन स्थानीक शेतकरी राजकीय पदाधिकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे टळले आहे. करोडो रुपयांची शेतजमीन व जीवंत विहिरी बचावल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

नशिराबाद- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत जिल्‘ात महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाच प्रक्रीया सुरू आहे. चौपदरीकरणाव्यतिरिक्त नशिराबाद येथे प्रास्तावित टोल नाक्यासाठी शेतकर्‍यांची होणारे अतिरिक्त भूसंपादन स्थानीक शेतकरी राजकीय पदाधिकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे टळले आहे. करोडो रुपयांची शेतजमीन व जीवंत विहिरी बचावल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान टोलनाक्यासाठीचे जास्तीचे१२६ मीटर रुंदीचे भूसंपादन न करता उपलब्ध ६० मीटर जागेतच झिकझॅक पद्धतीच्या टोलनाक्याची निर्मिती करण्यात यावी, असे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधकिरणाकडून भूसंपादन अधिकारी जळगाव यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
महामार्ग चौपदरीकरणा व्यतिरिक्त केवळ टोलनाक्यासाठी नशिराबादसह परिसरातील सुमारे २० एकर अतिरिक्त जमीनी संपादीत करण्याचा प्रयत्न महामार्गविभागाचा होता. त्यात करोडो रुपयांची शेतजमीनीसह सुमारे आठ जीवंत विहिरी नष्ट होणार होत्या. ही बाब माजी खासदार वाय.जी.महाजन, प्रगतीशील शेतकरी तथा भाजप शहराध्यक्ष लालचंद पाटील, गणपत सोमा पाटील, पराग रोटे, संजय चौधरी, दिलीप पाटील, सुपडू महाजन, अरुण नेमाडे, राजेंद्र पाचपांडे, भाजप पदाधिकार्‍यांसह शेकडो शेतकर्‍यांनी लक्षात घेता टोलनाक्यासाठीच्या अतिरिक्त भूसंपादनाला विरोध केला. यासंदर्भात पालकमंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.पाटील यांच्याकडे टोलनाक्याच्या अतिरिक्त भूसंपादनामुळे (कारण टोलनाका ठराविक काळानंतर संपुष्टात येतो व जमीन तशीच पडून राहिली असती) शेतकरी आयुष्यभर आर्थिक अडचणीत येणार होता. याबाबत त्यांना गार्‍हाणे मांडून निवेदन दिली. त्यांनी याबाबत सहानुभुतीपूर्वक पाठपुरावा करुन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना शेतकरीवर्गाची कैफीयत सांगितली. मंत्री नितीन गडकरी याबाबत दखल घेत केवळ केवळ टोलनाक्यासाठी अतिरिक्त भूसंपादन न करण्याचे आदेश काढले आहे. आहे त्याच जागेत झिकझॅक पद्धतीने नवीन टोलनाका उभारावा असे सांगितले. त्यामुळे शेतजमिनी व विहीरी वाचल्याने शेतकरीवर्ग आनंद व्यक्त करीत आहे. भाजपच्या व शेतकर्‍यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.