शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

चौपदरीकरणाच्या टोलनाक्यासाठी अतिरिक्त भूसंपादन टळले

By admin | Updated: March 14, 2016 00:10 IST

नशिराबाद- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत जिल्‘ात महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाच प्रक्रीया सुरू आहे. चौपदरीकरणाव्यतिरिक्त नशिराबाद येथे प्रास्तावित टोल नाक्यासाठी शेतकर्‍यांची होणारे अतिरिक्त भूसंपादन स्थानीक शेतकरी राजकीय पदाधिकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे टळले आहे. करोडो रुपयांची शेतजमीन व जीवंत विहिरी बचावल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

नशिराबाद- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत जिल्‘ात महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाच प्रक्रीया सुरू आहे. चौपदरीकरणाव्यतिरिक्त नशिराबाद येथे प्रास्तावित टोल नाक्यासाठी शेतकर्‍यांची होणारे अतिरिक्त भूसंपादन स्थानीक शेतकरी राजकीय पदाधिकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे टळले आहे. करोडो रुपयांची शेतजमीन व जीवंत विहिरी बचावल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान टोलनाक्यासाठीचे जास्तीचे१२६ मीटर रुंदीचे भूसंपादन न करता उपलब्ध ६० मीटर जागेतच झिकझॅक पद्धतीच्या टोलनाक्याची निर्मिती करण्यात यावी, असे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधकिरणाकडून भूसंपादन अधिकारी जळगाव यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
महामार्ग चौपदरीकरणा व्यतिरिक्त केवळ टोलनाक्यासाठी नशिराबादसह परिसरातील सुमारे २० एकर अतिरिक्त जमीनी संपादीत करण्याचा प्रयत्न महामार्गविभागाचा होता. त्यात करोडो रुपयांची शेतजमीनीसह सुमारे आठ जीवंत विहिरी नष्ट होणार होत्या. ही बाब माजी खासदार वाय.जी.महाजन, प्रगतीशील शेतकरी तथा भाजप शहराध्यक्ष लालचंद पाटील, गणपत सोमा पाटील, पराग रोटे, संजय चौधरी, दिलीप पाटील, सुपडू महाजन, अरुण नेमाडे, राजेंद्र पाचपांडे, भाजप पदाधिकार्‍यांसह शेकडो शेतकर्‍यांनी लक्षात घेता टोलनाक्यासाठीच्या अतिरिक्त भूसंपादनाला विरोध केला. यासंदर्भात पालकमंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.पाटील यांच्याकडे टोलनाक्याच्या अतिरिक्त भूसंपादनामुळे (कारण टोलनाका ठराविक काळानंतर संपुष्टात येतो व जमीन तशीच पडून राहिली असती) शेतकरी आयुष्यभर आर्थिक अडचणीत येणार होता. याबाबत त्यांना गार्‍हाणे मांडून निवेदन दिली. त्यांनी याबाबत सहानुभुतीपूर्वक पाठपुरावा करुन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना शेतकरीवर्गाची कैफीयत सांगितली. मंत्री नितीन गडकरी याबाबत दखल घेत केवळ केवळ टोलनाक्यासाठी अतिरिक्त भूसंपादन न करण्याचे आदेश काढले आहे. आहे त्याच जागेत झिकझॅक पद्धतीने नवीन टोलनाका उभारावा असे सांगितले. त्यामुळे शेतजमिनी व विहीरी वाचल्याने शेतकरीवर्ग आनंद व्यक्त करीत आहे. भाजपच्या व शेतकर्‍यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.