शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 6:33 PM

मोदी सरकारच्या पुढील धोरणांचे परराष्ट मंत्र्यांकडून संकेत

नवी दिल्ली: लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असेल, असं महत्त्वपूर्ण विधान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केलं आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताचाच हिस्सा आहे आणि लवकरच तो भौगोलिकदृष्ट्या भारतात असेल, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या पुढील धोरणांचे संकेत दिले. मोदी सरकार-२ ला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्या निमित्तानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीरसह कलम ३७० सह आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताच्या भूमिकेवरदेखील भाष्य केलं.  जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीरबद्दल विधानं केली आहेत. कलम ३७० नंतर आता पीओके सरकारच्या अजेंड्यावर असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं होतं. यानंतर आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीदेखील सिंह यांचीच री ओढली. कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. पाकिस्तानचा कलम ३७०शी काहीही संबंध नाही. पाकिस्तानचा संबंध दहशतवादाशी आहे, असं जयशंकर यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हटलं.  काश्मीर आणि कलम ३७० चा मुद्दा वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेणाऱ्या पाकिस्तानलादेखील जयशंकर यांनी टोला लगावला. कलम ३७० हा पूर्णपणे अंतर्गत मुद्दा आहे. आंततराष्ट्रीय समुदायाला या विषयाची कल्पना आहे, असं जयशंकर म्हणाले. पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रात कलम ३७० चा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र इतर देशांनी पाठिंबा न दिल्यानं पाकिस्तान तोंडावर आपटला होता. जयशंकर यांनी सार्कबद्दल बोलतानाही पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली. सार्क दक्षिण आशियातील देशांची संघटना आहे. तिचा संबंध व्यापार, दळणवळणाशी आहे. या गोष्टींमधील सहकार्यासाठी दहशतवादाची आवश्यकता नाही. कोणता देश सार्कला पुढे नेतोय आणि कोणता देश दहशतवादाला प्रोत्साहन देतोय, याचा विचार सार्क देशांनी करावा, असं जयशंकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ