शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

१२ तास काम, २ तास ओव्हरटाईम; कामाची वेळ वाढवण्यासाठी IT कंपन्यांनी मागितली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 12:13 IST

कर्नाटकातील आयटी कंपन्यांनी कामाचे तास वाढवण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.

IT Working Hours :  कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारने काही दिवसांपूर्वी खासगी कंपन्यांमधील नोकऱ्यांमध्ये १०० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला विरोध होताच सरकारने तो मागे घेतला. या निर्णयामुळे कंपन्यांनी धास्ती घेतली होती. त्यानंतर आता कर्नाटकातील आयटी कंपन्यांनी मोठी मागणी केली आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्नाटकातील आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास १४ तासांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारला पाठवला आहे. 

कर्मचाऱ्यांचे कामाचे तास १४ तासांपर्यंत वाढवण्याची मागणी करणारा प्रस्ताव आयटी कंपन्यांनी कर्नाटक सरकारला सादर केला. या प्रस्तावाला कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. आरोग्याच्या समस्या आणि नोकर कपातीच्या चिंतेचा हवाला देत कर्मचाऱ्यांनी याला अमानवीय म्हटले. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकार कर्नाटक शॉप्स अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा विचार करत आहे. आयटी कंपन्यांना त्यांच्या प्रस्तावाचा या दुरुस्तीमध्ये समावेश करायचा आहे, ज्यामुळे कायदेशीररित्या कामाचे तास १४ तासांपर्यंत होणार आहेत.

जर सरकारने कायद्यामध्ये सुधारणा करताना आयटी कंपन्यांचा प्रस्ताव मान्य केला तर कायदेशीर कामकाजाचे तास १४ तास होणार आहेत. यामध्ये १२ तास + २ तास ओव्हरटाइम अशी शिफ्ट असणार आहे. सध्या कामगार कायदे १२ तासांपर्यंत (१० तास + २ तास ओव्हरटाइम) काम करण्यास परवानगी देतात. नव्या प्रस्तावामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण वाढण्याची शक्यता आहे.

"आयटी/आयटीईएस/बीपीओ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दररोज १२ तासांपेक्षा जास्त आणि सलग तीन महिन्यांत २५ तासांपेक्षा जास्त काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते",  असे आयटी क्षेत्रासाठी नवीन प्रस्तावात म्हटले आहे. याबाबत सरकारने प्राथमिक बैठक घेतली असून लवकरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रस्तावावर मंत्रिमंडळातही चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आयटी कंपन्यांचा या प्रस्तावाचा कर्नाटक राज्य आयटी/आयटीईएस एम्प्लॉईज युनियनने तीव्र विरोध केला आहे. कामाच्या शिफ्टची संख्या कमी झाल्यामुळे एक तृतीयांश कर्मचारी बेरोजगार होतील, असा इशारा युनियनने निवेदनाद्वारे दिला आहे. या दुरुस्तीमुळे कंपन्यांना सध्याच्या तीन-शिफ्ट पद्धतीऐवजी दोन-शिफ्ट पद्धतीचा अवलंब करता येणार आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकITमाहिती तंत्रज्ञान