शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 05:02 IST

केंद्र सरकारने परवानगी दिलेली कांद्यांची निर्यात बांगला देश, संयुक्त अरब अमिरात, भूतान, बाहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या देशांना करण्यात येईल.

नवी दिल्ली/नाशिक : दोन दिवसांपूर्वी गुजरातहून दोन हजार मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे संतप्त पडसाद उमटले. त्याची दखल घेत केंद्र सरकारकडून २९,१५० टन लाल कांदा सहा देशांमध्ये निर्यात करण्यास परवानगी देण्याची अधिसूचना शनिवारी जारी केली. मात्र हा निर्णय जुनाच असून आकडेवारी एकत्र करून नव्याने अधिसूचना जारी केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्याचे स्पष्टीकरण देण्याची मागणीही केली आहे.

केंद्र सरकारने परवानगी दिलेली कांद्यांची निर्यात बांगला देश, संयुक्त अरब अमिरात, भूतान, बाहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या देशांना करण्यात येईल. केंद्राने गुजरातमधून दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस परवानगी दिल्यावर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील मतदानावर व्हायला नको म्हणून सरकारने सहा देशांच्या कांदा निर्यातीस परवानगी दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पहिल्या घोषणेतील निम्म्या कांद्याचीही निर्यात झाली नाही

• शेतकयांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने पाच मित्रदेशांना सुमारे १९९ हजार मे. टन कांदा निर्यात करण्याची मार्चमध्ये घोषणा केली होती.मात्र, प्रत्यक्षात केवळ सहा हजार मेट्रिक • टनांचीच आतापर्यंत निर्यात झाली आहे. परंतुया देशांत तस्करीद्वारे मोठ्या प्रमाणात कांदा पोहोचत असल्याने निम्म्याच कांद्याचा पुरवठा प्रत्यक्षात झाला.त्यामुळे आता पुन्हा सहा देशामध्ये ९९ हजार टन कांद्याच्या निर्यातीस केंद्र सरकारने दिलेली परवानगी कितपत यशस्वी होते. याबाबत कांदा उत्पादकांमध्ये शंका व्यक्त होत आहे.

शेजारील देशांनी टंचाईमुळे किमान थोडा कांदा पुरवठाकरण्याची विनंती भारताकडे केली होती. त्यानुसार मागील महिन्यात सहा देशांना थोडाथोडा कांदा देण्याचे ठरले.

शेतकऱ्यांचे काय म्हणणे?

• कांदा उत्पादक संघटनेचे नेते भारत विघोळे, निवृत्ती न्याहारकर, आदींनी मात्र कांदा निर्यातीच्या निर्णयाबाबत सावध प्रतिक्रिया दिली.■ मागील वर्षभरात केंद्र सरकारने कोणत्या देशांसाठी किती कांटा निर्यातीस परवानगी दिली, याची ही एकत्रित आकडेवारी आहे, असे सांगितले.■ केंद्र सरकारने नव्याने कांदा निर्यातीला परवानगी दिली नाही. तसेच निर्यातीच्या परवानगीचे कोणतेही परिपत्रक निघालेले नाही, असे ते म्हणाले. आकडेवारी एकत्रित करून कांदा निर्यात होणार असल्याची चर्चा यामुळे रंगली आहे.

सरसकट निर्यातबंदी उठवा

सरकारने सरसकट कांदा निर्यातबंदी उठवायला पाहिजे. ही अधिसूचना म्हणजे दर्यात खसखस आहे, असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी म्हटले आहे.

पुन्हा दिशाभूल झाली आहे का?

जुनेच आकडे दाखवून नव्याने कांदा निर्यात होणार आहे. असे भासवले जाते आहे का? असे असेल तर ही फसवणूक ठरेल, केंद्र सरकारने याबाबत तातडीने खुलासा करावा व संभ्रम दूर करावा. कांद्याची निर्यात चंदी कायमस्वरूपी उठवून शेतकऱ्याऱ्यांना दिलासा द्यावा, असे किसान सभेचे अजित नवले म्हणाले.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी