शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

काश्मीर रेल्वेतून अनुभवा पृथ्वीवरील नंदनवनाचे सौंदर्य; विविध रूपे पाहून सर्वांना होईल आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:04 IST

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, जे इंग्रज करू शकले नाहीत, ते पंतप्रधान मोदींनी केले

सुरेश एस डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, कटरा: जगातील सर्वात उंच असलेल्या कमानी रेल्वे पुलावरून धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस हे आता केवळ स्वप्न न उरता ती गोष्ट प्रत्यक्षात साकारली आहे. पृथ्वीवरील नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये रेल्वेतून प्रवास करणे ही एक नेत्रसुखद प्रवासाची संधी आहे. पर्यटक, प्रवासी तेथील निसर्गरम्य परिसर पाहून अतिशय आनंदी होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कटरा आणि श्रीनगर यादरम्यान धावणाऱ्या दोन खास वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनमुळे प्रवासाचा कालावधी २-३ तासांनी कमी झाला आहे. तसेच, काश्मीर खोऱ्याशी सर्व ऋतूंमध्ये संपर्क राखता येईल, असा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे. काश्मीरमधील ट्रेन खोल दऱ्या, हिमालयाच्या भव्य शिखरांचे दर्शन घडवत व घनदाट जंगलांनी वेढलेल्या पर्वतराजीतून वाट काढत धावते. शिवालिक डोंगररांगेत खोदलेल्या बोगद्यांतून आणि चिनाब नदीला प्रवास करत ही रेल्वे निसर्गाशीच जणू संवाद साधते. जम्मूतील कटरा ते श्रीनगर ही रेल्वे सफर ही देशातील सर्वात नयनरम्य प्रवासांपैकी एक ठरली आहे.

लोको पायलट मनोजकुमार मीणा यांनी सांगितले की, ही फक्त एक ट्रेन नाही, तर ही निसर्गाच्या जादूई दुनियेतील सफर आहे. जे इंग्रज करू शकले नाहीत, ते पंतप्रधान मोदींनी केले या शब्दांत मुख्यमंत्री अब्दुल्लांनी कौतुक केले.

मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर वंदे भारत ट्रेन चिनाब पुलावर पोहोचली, तेव्हा ट्रेनमधील विद्यार्थ्यांनी जय मातादीचा जयघोष केला. मोदींनीही चिनाब पुलाची पाहणी केली.

बदलत्या दृश्यांची पडते भुरळ

रेल्वे कर्मचारी साहिलकुमार म्हणाले की, ही ट्रेन काश्मीरमधील डोंगराळ भागात पोहोचते तेव्हा विविध ऋतूंमधील बदलती दृश्य भूरळ घालतात. हिमाच्छादित जंगलं, वसंतात फुललेली झाडं, उन्हाळ्यातील निसर्ग आणि शरद ऋतूतील सोनसळी छटा अशी निसर्गरूपे समोर येतात. 

अभियांत्रिकी चमत्कारांनी घडलेला नवा मार्ग

काश्मीर रेल्वे मार्गातील कटरा-बनिहाल या दरम्यानचा आणखी एक अभियांत्रिकी चमत्कार म्हणजे अंजी खड्ड पूल. हा भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल आहे. ७२५ मीटर लांब आणि ३३१ मीटर उंचीचा हा पूल ९६ केबलवर उभा आहे आणि पर्यटकांसाठी ते एक खास आकर्षण आहे. २७२ किलोमीटर लांब उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे प्रकल्प सुमारे ४३,७८० रुपये कोटी खर्च करून पूर्ण करण्यात आला. त्यात ३६ बोगदे (एकूण ११९ किमी) आणि ९४३ पूल आहेत. या मार्गावरून रेल्वेने प्रवास करा व भारतातील स्वित्झर्लंडचा अनुभव घ्या, असे वर्णन अनेकांनी केले आहे. 

डिमोशन झाले, पण चूक दुरुस्त होईल : अब्दुल्ला

जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांकडे केली. ते म्हणाले की, कटरा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन झाले त्यावेळी मी एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. आता मी केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे. एकप्रकारे हे थोडेसे डिमोशनच झाले आहे. पण, मला विश्वास आहे की ही चूक लवकरच दुरुस्त होईल. जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल केला जाईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOmar Abdullahउमर अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर