शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मेघालयात खाणीमध्ये अडकलेल्यांच्या नातेवाईकांना चमत्कार घडण्याची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 05:38 IST

मेघालयाच्या कोळसा खाणीमध्ये नदीचे पाणी शिरल्याने गेले तेरा दिवस अडकून पडलेल्या १५ कामगारांच्या सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

गुवाहाटी : मेघालयाच्या कोळसा खाणीमध्ये नदीचे पाणी शिरल्याने गेले तेरा दिवस अडकून पडलेल्या १५ कामगारांच्या सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. काहीतरी चमत्कार घडून हे सारे जण बचावतील, अशी आशा त्यांच्यापैकी काही जणांच्या नातेवाईकांना अजूनही वाटत आहे.या राज्यातील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यात कोळसा खाणींमध्ये बेकायदेशीररीत्या खाणकाम केले जाते. तेथील एका खाणीत अशाच प्रकारे बोगदा खणत असताना ही दुर्घटना घडली. मेघालयाचे आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री केरमेन शीला यांनी सांगितले की, देव काहीतरी चमत्कार घडवेल व या साऱ्यांना वाचवेल, अशी आशा वाटते.खाणीशेजारच्या नदीतून आणखी पाणी बोगद्यात घुसल्याने रविवारी बचावकार्य तात्पुरते थांबविण्यात आले होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे १०० जवान या खाणीच्या जवळच तळ ठोकून आहेत. बचावकार्यासाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध होत नसल्याने या कामात खूप अडचणी येत आहेत.या खाणीत अडकलेल्या पंधरा कामगारांमध्ये सात जण पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील आहेत. त्याशिवाय त्यात आसाममधील पाच, जिथे ही दुर्घटना झाली त्या लुमथारी गावातील तीन जणांचाही समावेश आहे. या कामगारांपैकी एकही जण बचावणार नाही, असे खाणीत अडकलेल्यांपैकी काही जणांच्या नातेवाईकांना वाटते, तर काही जणांना चमत्कार घडून सगळे सुखरूप परततील, अशी आशाआहे. (वृत्तसंस्था)कॅमेºयांसमोर पोझ देणे मोदींनी थांबवून त्यांना वाचवावे : राहुल गांधीनवी दिल्ली : बोगीबिल पुलाच्या बांधणीबाबत स्वत:ची पाठ थोपटून घेणे, कॅमेºयांसमोर पोज देणे या गोष्टी करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयातील कोळसा खाणीमध्ये अडकलेल्या १५ जणांना वाचवावे, असे कळकळीचे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. या खाणीमध्ये घुसलेले पाणी बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेले उच्च दाबाचे पंप देण्यास मोदी सरकारने असमर्थतता दर्शविली आहे.राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आसाममधील पुलाचे श्रेय घेण्याकरिता सरसावलेल्या मोदींना त्याच्या शेजारील मेघालय राज्यात १५ जण खाणीत अडकले आहेत, त्यांना तिथे मोकळा श्वास घेणेही कठीण जात आहे याचे काहीही सोयरसुतक नाही.मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यातील कोळसा खाणीत १३ डिसेंबरपासून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे त्या राज्याच्या गृहखात्याने म्हटले आहे. येथील कोळसा खाणींत बेकायदा खाणकाम चालते. त्यासाठी बालमजुरांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या गोष्टी रोखण्यासाठी यापूर्वी केंद्र सरकारने पावले उचलली होती.

टॅग्स :AccidentअपघातIndiaभारत