शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

मेघालयात खाणीमध्ये अडकलेल्यांच्या नातेवाईकांना चमत्कार घडण्याची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 05:38 IST

मेघालयाच्या कोळसा खाणीमध्ये नदीचे पाणी शिरल्याने गेले तेरा दिवस अडकून पडलेल्या १५ कामगारांच्या सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

गुवाहाटी : मेघालयाच्या कोळसा खाणीमध्ये नदीचे पाणी शिरल्याने गेले तेरा दिवस अडकून पडलेल्या १५ कामगारांच्या सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. काहीतरी चमत्कार घडून हे सारे जण बचावतील, अशी आशा त्यांच्यापैकी काही जणांच्या नातेवाईकांना अजूनही वाटत आहे.या राज्यातील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यात कोळसा खाणींमध्ये बेकायदेशीररीत्या खाणकाम केले जाते. तेथील एका खाणीत अशाच प्रकारे बोगदा खणत असताना ही दुर्घटना घडली. मेघालयाचे आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री केरमेन शीला यांनी सांगितले की, देव काहीतरी चमत्कार घडवेल व या साऱ्यांना वाचवेल, अशी आशा वाटते.खाणीशेजारच्या नदीतून आणखी पाणी बोगद्यात घुसल्याने रविवारी बचावकार्य तात्पुरते थांबविण्यात आले होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे १०० जवान या खाणीच्या जवळच तळ ठोकून आहेत. बचावकार्यासाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध होत नसल्याने या कामात खूप अडचणी येत आहेत.या खाणीत अडकलेल्या पंधरा कामगारांमध्ये सात जण पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील आहेत. त्याशिवाय त्यात आसाममधील पाच, जिथे ही दुर्घटना झाली त्या लुमथारी गावातील तीन जणांचाही समावेश आहे. या कामगारांपैकी एकही जण बचावणार नाही, असे खाणीत अडकलेल्यांपैकी काही जणांच्या नातेवाईकांना वाटते, तर काही जणांना चमत्कार घडून सगळे सुखरूप परततील, अशी आशाआहे. (वृत्तसंस्था)कॅमेºयांसमोर पोझ देणे मोदींनी थांबवून त्यांना वाचवावे : राहुल गांधीनवी दिल्ली : बोगीबिल पुलाच्या बांधणीबाबत स्वत:ची पाठ थोपटून घेणे, कॅमेºयांसमोर पोज देणे या गोष्टी करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयातील कोळसा खाणीमध्ये अडकलेल्या १५ जणांना वाचवावे, असे कळकळीचे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. या खाणीमध्ये घुसलेले पाणी बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेले उच्च दाबाचे पंप देण्यास मोदी सरकारने असमर्थतता दर्शविली आहे.राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आसाममधील पुलाचे श्रेय घेण्याकरिता सरसावलेल्या मोदींना त्याच्या शेजारील मेघालय राज्यात १५ जण खाणीत अडकले आहेत, त्यांना तिथे मोकळा श्वास घेणेही कठीण जात आहे याचे काहीही सोयरसुतक नाही.मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यातील कोळसा खाणीत १३ डिसेंबरपासून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे त्या राज्याच्या गृहखात्याने म्हटले आहे. येथील कोळसा खाणींत बेकायदा खाणकाम चालते. त्यासाठी बालमजुरांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या गोष्टी रोखण्यासाठी यापूर्वी केंद्र सरकारने पावले उचलली होती.

टॅग्स :AccidentअपघातIndiaभारत