शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

मेघालयात खाणीमध्ये अडकलेल्यांच्या नातेवाईकांना चमत्कार घडण्याची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 05:38 IST

मेघालयाच्या कोळसा खाणीमध्ये नदीचे पाणी शिरल्याने गेले तेरा दिवस अडकून पडलेल्या १५ कामगारांच्या सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

गुवाहाटी : मेघालयाच्या कोळसा खाणीमध्ये नदीचे पाणी शिरल्याने गेले तेरा दिवस अडकून पडलेल्या १५ कामगारांच्या सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. काहीतरी चमत्कार घडून हे सारे जण बचावतील, अशी आशा त्यांच्यापैकी काही जणांच्या नातेवाईकांना अजूनही वाटत आहे.या राज्यातील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यात कोळसा खाणींमध्ये बेकायदेशीररीत्या खाणकाम केले जाते. तेथील एका खाणीत अशाच प्रकारे बोगदा खणत असताना ही दुर्घटना घडली. मेघालयाचे आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री केरमेन शीला यांनी सांगितले की, देव काहीतरी चमत्कार घडवेल व या साऱ्यांना वाचवेल, अशी आशा वाटते.खाणीशेजारच्या नदीतून आणखी पाणी बोगद्यात घुसल्याने रविवारी बचावकार्य तात्पुरते थांबविण्यात आले होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे १०० जवान या खाणीच्या जवळच तळ ठोकून आहेत. बचावकार्यासाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध होत नसल्याने या कामात खूप अडचणी येत आहेत.या खाणीत अडकलेल्या पंधरा कामगारांमध्ये सात जण पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील आहेत. त्याशिवाय त्यात आसाममधील पाच, जिथे ही दुर्घटना झाली त्या लुमथारी गावातील तीन जणांचाही समावेश आहे. या कामगारांपैकी एकही जण बचावणार नाही, असे खाणीत अडकलेल्यांपैकी काही जणांच्या नातेवाईकांना वाटते, तर काही जणांना चमत्कार घडून सगळे सुखरूप परततील, अशी आशाआहे. (वृत्तसंस्था)कॅमेºयांसमोर पोझ देणे मोदींनी थांबवून त्यांना वाचवावे : राहुल गांधीनवी दिल्ली : बोगीबिल पुलाच्या बांधणीबाबत स्वत:ची पाठ थोपटून घेणे, कॅमेºयांसमोर पोज देणे या गोष्टी करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयातील कोळसा खाणीमध्ये अडकलेल्या १५ जणांना वाचवावे, असे कळकळीचे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. या खाणीमध्ये घुसलेले पाणी बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेले उच्च दाबाचे पंप देण्यास मोदी सरकारने असमर्थतता दर्शविली आहे.राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आसाममधील पुलाचे श्रेय घेण्याकरिता सरसावलेल्या मोदींना त्याच्या शेजारील मेघालय राज्यात १५ जण खाणीत अडकले आहेत, त्यांना तिथे मोकळा श्वास घेणेही कठीण जात आहे याचे काहीही सोयरसुतक नाही.मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यातील कोळसा खाणीत १३ डिसेंबरपासून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे त्या राज्याच्या गृहखात्याने म्हटले आहे. येथील कोळसा खाणींत बेकायदा खाणकाम चालते. त्यासाठी बालमजुरांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या गोष्टी रोखण्यासाठी यापूर्वी केंद्र सरकारने पावले उचलली होती.

टॅग्स :AccidentअपघातIndiaभारत