शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

त्यामुळे  चुकीचे ठरू शकतात लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 09:54 IST

बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि एनडीएला आघाडी दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात निकालही तसाच लागेल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यासाठी आता 24 तासांहून कमी अवधी राहिला आहे. दरम्यान,  मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर  विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमधून केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि एनडीएला आघाडी दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात निकालही तसाच लागेल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. कारण अनेकदा एक्झिट पोल आणि प्रत्यक्ष निकाल यात कमालीची तफावत दिसून आलेली आहे. त्यामुळे गुरुवारीसुद्धा प्रत्यक्ष निकाल आणि एक्झिट पोल यांच्यात फरक दिसू शकत. 2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तेत पुनरागमन करेल, असा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोलनी वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात  मतमोजणीनंतर निकाल वेगळेच लागले. 2009 मध्ये सुद्धा एनडीए आणि यूपीएमध्ये अटीतटीची लढाई होण्याची शक्यता एक्झिट पोलनी वर्तवली होती. मात्र यूपीएने एकतर्फी विजय मिळवला होता.  एक्झिट पोल चुकीचे ठरण्याची अनेक कारणे आहेत. एक्झिट पोलचा सर्वे करण्यासाठी फार कमी मतदारांचे मत विचारात घेतले जाते. हे ठरावीक मतदार म्हणजे सर्व मतदारांचे प्रतिनिधी ठरत नाही. एक्झिट पोलसाठी घेतलेल्या मतदारांच्या मताची सॅम्पल साइझ खूप कमी असल्याने काही चूक झाल्यास त्याचा निकालावर मोठा परिणाम होऊ शकतो. असे एक्झिट पोल पक्षांना मिळणाऱ्या मतांचे प्रमाण जाणून घेण्याच्या दृष्टीने डिझाइन केले जातात. त्यात प्रत्यक्ष किती जागा मिळणार याची चर्चा होत नाही. नंतर हे मतांचे प्रमाण जागांमध्ये परिवर्तीत केले जाते. त्यामुळे जागांचा योग्य अंदाज काढणे कठीण होते. त्यातही जर बहुरंगी लढत असेल तर मतदानाच्या टक्केवारीवरून जागांचा अंदाज लावणे कठीण होते. 

 एक्झिट पोल चुकीचे ठरल्यास त्याची अनेक कारणे सांगितली जाता. उदाहरणच द्यायचं तर कौल जाणून घेण्यासाठी चुकीच्या मतदारांना मिळालेले प्राधान्य, संबंधित मतदारांनी दिलेली चुकीची उत्तरे, कल जाणून घेण्यासाठी घेतलेल्या नमुन्यात असलेल्या चुका, तसेच सर्वसामान्यांच्या अपेक्षेनुरूप निकाल दाखवण्यासाठी केलेला फेरफार, अशी कारणे एक्झिट पोल चुकीचे ठरल्यानंतर दिले जातात. दरम्यान, मतमोजणीवेळी प्रथम व्हीव्हीपॅटची मतमोजणी करायची की इव्हीएममधील मतांची मोजणी करायची याचा निर्णय निवडणूक आयोग आज घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही पाच पोलिंग बूथवरील इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांजी मोजणी करून त्यांची आकडेवारी जुळवून घेण्यात येणार आहे. मंगळावारी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन प्रथम व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करण्याची मागणी केली होती.  

 

टॅग्स :Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेस