शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 09:07 IST

Make In India : २०१४ साली सुरु करण्यात आलेल्या मेक इन इंडिया योजनेच्या माध्यमातून किती रोजगार निर्मिती झाली याबद्दल पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं.

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून बेरोजगारी, उद्योगधंद्यांच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. सरकारने गेल्या १० वर्षात रोजगाराचे दिलेले आश्वासन पूर्ण केलेलं नाही म्हणत विरोधकांनी पंतप्रधान मोदींना घेरलं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी लोकमत समूहाला विशेष मुलाखत दिली. लोकमत समूहाचे सह-व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर, मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी पंतप्रधानांना अनेक मुद्द्यांवर बोलते केले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही मुलाखत पार पडली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया योजनांच्या यशाबद्दल भाष्य केलं आहे.

मोदी सरकारने सप्टेंबर २०१४ मध्ये मेक इन इंडिया मोहीम सुरू केली होती. या मोहिमेचे उद्दिष्ट गुंतवणूक आणि नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे, कौशल्य विकासात सुधारणा करणे, बौद्धिक संपदेचे संरक्षण करणे आणि जागतिक दर्जाच्या उत्पादन पायाभूत सुविधा निर्माण करणे हे होते. याशिवाय सरकारने मेक इन इंडियाच्या माध्यातून सुधारणांच्या आघाडीवर अनेक महत्त्वाची पावले उचलली होती. मात्र विरोधकांकडून गेल्या १० वर्षात किती तरुणांना रोजगार मिळाला असा सवाल विचारला जातोय. यासोबत मोदी सरकारने सुरु केलेल्या मेक इन इंडियासारख्या योजनांचा किती फायदा झाला असाही प्रश्न विचारला जातो. त्यावर आता पंतप्रधान मोदी यांनी मेक इन इंडिया योजनेच्या यशाबाबत भाष्य केलं आहे.

मेक इन इंडिया देशाला किती फायदा झाला?

"रोजगार निर्मिती आणि विकास या दोन्ही मुद्द्यांतील वस्तुस्थिती तुमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या प्रमुख माध्यम समूहाने समजून घेतली, याचा मला विशेष आनंद आहे. जेव्हा आम्ही रोजगार, नोकऱ्या यांच्याबद्दल बोलतो, त्यावेळी नेहमीच वस्तुनिष्ठ मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी खोट्या गोष्टी पसरवल्या जातात. सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र, उद्योजकता किंवा नव्याने निर्माण झालेली क्षेत्रे या सर्वांमध्ये तरुणांना अधिकाधिक संधी निश्चितपणे मिळाव्यात, यासाठी आम्ही बहुव्यापी रणनीती आखली आहे. उदाहरणार्थ सरकारी नोकऱ्यांचेच पाहा. आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मी नियमितपणे रोजगार मेळावे घेतले आहेत. याद्वारे लाखो तरुणांना त्यांच्या नोकरीचे पत्र मिळाले आहे. खासगी क्षेत्रात उत्पादन क्षेत्र व स्टार्टअप यांचे प्रमाण लक्षणीय आहे," असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातही या मेक इन इंडियावर लक्ष केंद्रित करत सरकारने आत्मनिर्भर भारत अशी मोहीम राबवली होती. मेक इन इंडियाबाबत तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. काही तज्ञांचे म्हणणे आहे की हे खूप महत्वाकांक्षी आहे आणि मेक इन इंडिया मोहिमेला अजून गती मिळू शकलेली नाही. तसेच, भारत उत्पादनाऐवजी असेंबलिंगचे केंद्र बनत आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीMake In Indiaमेक इन इंडियाBJPभाजपा