शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Coronavirus : भारतातही ब्रिटनसारखी भयावह परिस्थिती?; पाहा काय म्हणाले AIIMS चे प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 09:20 IST

Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून भारतात होत आहे मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून भारतात होत आहे मोठ्या प्रमाणात रुग्णवाढमोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी रणनिती आवश्यक असल्याचं गुलेरिया यांचं मत

भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. देशात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंदही होत आहे. यामुळे प्रशासनाची चिंताही वाढली आहे. परंतु कोरोनाशी लढण्यासाठी अनेक पावलंही उचलली जात आहेत. दरम्यान, देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात  वाढ होण्यामागील कारण म्हणजे नवा स्ट्रेन असल्याची माहिती एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिली. ही परिस्थिती अगदी ब्रिटेनसारखी आहे. ख्रिसमसच्या दरम्यान ब्रिटनदेखील कोरोना विषाणूच्या म्युटेशनच्या प्रादुर्भावातून जात होता, असं त्यांनी नमूद केलं."होळीच्या दरम्यान देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसली. कारण तशीच परिस्थिती पुन्हा पाहायला मिळत आहे. असंही होऊ शकतं की असा कोणतं म्युटेशन असेल जे विषाणूपेक्षा अधिक संसर्ग पसरवणारा असू शकतो. डेटा नाही याचा अर्थ असा नाही की याचे पुरावेच नाहीत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही म्युटेशनशीच संबंधित आहे," असं गुलेरिया म्हणाले. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. "कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक झालेल्या वाढीमागे काहीतरी नक्कीच आहे जे त्या विषाणूला अधिक संसर्गजन्य बनवत आहे," असंही त्यांनी नमूद केलं.लसीकरणासाठी रणनिती आवश्यकआपल्याला अशी रणनिती तयार करण्याची गरज आहे ज्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू आणि त्यांचं लसीकरण करू शकू. परंतु अश स्थितीत आपल्याला लसीच्या प्रत्येक प्रतिकूल प्रभावावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचंही गुलेरिया म्हणाले. "सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक अशा लसींचं उत्पादन करण्यावर विचार करत आहेत ज्या लहान मुलांनाही देता येतील. जर महासाथीला आपल्याला नियंत्रणात आणायचं असेल तर अशा लसींचीही आपल्याला गरज आहे ज्या लहान मुलांना देता येतील. त्याचवेळी आपण त्यांना शाळेत पाठवू शकू," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतEnglandइंग्लंडSchoolशाळा