शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

“दावा ३० कोटींचा, पण खरं लसीकरण ४ कोटीच”; माजी केंद्रीय मंत्र्याचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 15:03 IST

माजी केंद्रीय मंत्र्यानं लसीकरणाच्या वेगावर व्यक्त केली चिंता. आम्हाला लस हवी आहे, मगरीचे अश्रू नकोत, काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देमाजी केंद्रीय मंत्र्यानं लसीकरणाच्या वेगावर व्यक्त केली चिंता. आम्हाला लस हवी आहे, मगरीचे अश्रू नकोत, काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला मंजुरी दिली आहे. परंतु अनेक ठिकाणी लसींची कमतरता असल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी करोनाच्या लसीकरणावर (Covid Vaccination) वेगावर चिंता व्यक्त केली आहे. तसंच त्यांनी मोदी सरकारवर (Narendra Modi Government) निशाणा साधला आहे. आम्हाला लस हवी आहे, अश्रू नकोत, असंही ते म्हणाले आहेत. “केंद्र सरकारनं २१ जानेवारी २०२१ रोजी दावा केला होता की जुलै अखेरपर्यंत ३० कोटी भारतीयाचं पूर्ण लसीकरण केलं जाईल. परंतु सत्य हे आहे की २२ मे २०२१ पर्यंत केवळ ४.१ कोटी भारतीयांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत,” असं जयराम रमेश म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रावर निशाणा साधला. “केंद्र सरकारनं २१ मे रोजी दावा केला होता की २०२१ च्या अखेरपर्यंत भारतात सर्व ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण केलं जाईल. परंतु सत्य हे आहे की २१ मे रोजी एका दिवसात केवळ १४५ लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं. आम्हाला लस हवी आहे मगरीचे अश्रू नकोत,” असंही ते म्हणाले. मोदी झाले होते भावूककोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या काही राज्यांतील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यासोबतच, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्संसोबतही चर्चा केली. त्यांनी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. त्यावेळी, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधील डॉक्टरांशी बोलताना प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केलं. तसेच, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाचंही कौतुक केलं. मात्र, कोविडच्या लढाईत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचा उल्लेख करताना मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालंय. कोरोनाच्या लढाईत आपण अनेक आप्तेष्ठांना गमावलंय. मी काशीचा एक सेवक असून काशीतील प्रत्येकाचे आभार मानतो. विशेषत: डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य सेवकांनी जे काम केलंय, ते कौतुकास्पद आहे. या महामारीने आपल्या जवळील माणसं नेली आहेत. त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असंही मोदी म्हणाले होते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतcongressकाँग्रेस