शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या त्या विधानामुळे माजी सैनिक संतप्त, तीव्र शब्दांत व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 18:13 IST

शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली नसल्याचे, तसेच भारताची कुठलीही चौकी चीनच्या ताब्यात नसल्याचे विधान केल्याने मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.

 नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनी सैन्याने केलेली घुसखोरी आणि नंतर भारत आणि चिनी सैन्यामध्ये झालेल्या झटापटीत २० भारतीय जवानांना आलेले वीरमरण यामुळे सध्या देशातील वातावरण तापलेले आहे. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली नसल्याचे, तसेच भारताची कुठलीही चौकी चीनच्या ताब्यात नसल्याचे विधान केल्याने मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. मोदींच्या या विधानाविरोधात लष्करातील अनेक निवृत्त अधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

या संबोधनादरम्यान, मोदींनी भारत हा शांतता आणि मित्रत्वावर विश्वास ठेवतो. मात्र आपले सार्वभौमत्व आणि अखंडत्वही कायम राखण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगितले होते. दरम्यान, मोदींनी चिनी घुसखोरीबाबत केलेल्या विधानाचा तीव्र शब्दांत विरोध करत भारतीय लष्करातील अनेक निवृत्त अधिकाऱ्यांनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

 लेफ्टनंट जनरल प्रकाश मेनन मोदींच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त करताना म्हणाले की, चीन भारताच्या हद्दील घुसलेला नाही, असे सांगून पंतप्रधान मोदींनी आरएमने सांगितलेल्या गोष्टीचे खंडन केले आहे. आपण चीनचा दावा मान्य केला आहे का? सुरुवातीला तर आपण चीन गलवानमध्ये घुसल्याचे अधिकृतरीत्या हे मान्य केले होते.

अजय शुक्ला आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मी आताच टीव्हीवर नरेंद्र मोदी यांना भारत चीन सीमारेषेची पुनर्रचना करताना पाहिले. मोदींनी कुणीही भारताच्याय हद्दीत घुसला नसल्याचे सांगितले. गलवान खोरे आणि पँगाँग सरोवराजवळील फिंगर्स ४-८ आपले असल्याचा चीनने केलेला दावा त्यांनी मान्य केला आहे का?  

 लेफ्टनंट जनरल रामेश्वर रॉय यांनीही आपल्या ट्विटमधून मोदींविरोधात संताप व्यक्त केला आहे. आजचा दिवस दुर्दैवी आहे. मी आज निवृत्त आहे आणि माझा मुलगा लष्करात नाही, यासाठी मी माझ्या तीन स्टार्सचे आभार मानतो, असे ते म्हणाले.

मी चार दशके देशाची सेवा केली ती कशासाठी तर देशाच्या एकात्मता आणि अखंडतेसाठी. मात्र पूर्व लडाखमध्ये चीन एलएसी बदलत असून, भारत ते मान्य करत आहे, हे पाहून मला धक्का बसला आहे. माझ्यासारख्या प्रत्येक सैनिकासाठी हा दु:खद दिवस आहे, असे रामेश्वर रॉय पुढच्या ट्विटमध्ये म्हणाले.  

माजी लष्करी अधिकारी सँडी थापर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, तर भाताच्या भूमीवर कुठलेही अतिक्रमण झाले नाही आणि भारताने आपली एकही चौकी गमावली नाही. आपले जवाना चीनच्या भूमीवर त्यांना हटवण्यासाठी गेले नाहीत? हेच तर चीनकडून सांगण्यात येत आहे. १६ बिहारच्या वीर जवानांचे बलिदान विसरण्यासाठी भारताला केवळ ४८ तास लागले, ही लाजिरवाणी बाब आहे.  

बीरेंद्र धनोआ यांनीही अशीच संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मारता मारता कुठे मरण आले हे विचारण्याची आम्हाला परवानगी आहे का?

कर्नल संजय पांडे यांनीही मोदींच्या विधानाविरोधात संताप व्यक्त केला आहे. आता चीनला भारताचा भूभाग हडप करण्याचा परवाना मिळाला आहे. ते अतिक्रमण करत नाही आहेत. त्यांनी भारताची कुठलीही जमीन बळकावली नाही. २० जवानांनी आत्महत्या केली. बाकी सर्व ठीक आहे. द ग्रेट चायना लँड माफिया सपोर्टेड बाय इंडिया

 मेजर डीपी सिंह यांनीही मोदींच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांचे भाषण ऐकले, कुणी माझे किंवा अन्य जवानांचे मनोधैर्य कमी करू शकत नाही, मला वाटले ते आमचे मनोबल अजून वाढवतील. पण मी चुकीचा होतो.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानladakhलडाखIndiaभारतchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी