शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

गुजराल यांचं ऐकलं असतं तर शीख दंगली झाल्या नसत्या - मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 06:44 IST

'कदाचित 1984 चा नरसंहार होण्यापासून वाचला असता'

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1984 च्या शीख दंगलीवरून मोठे वक्तव्य केले आहे. जर तत्कालीन गृहमंत्री पी. व्ही. नरसिंह राव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर दिल्लीत शीख नरसंहार झाला नसता, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. बुधवारी दिल्लीत माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बोलत होते. 

दिल्लीत 1984 ला शिख दंगली होत होत्या. त्यावेळी इंद्रकुमार गुजराल तत्कालीन गृहमंत्री पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे गेले होते. त्यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांना सांगितले की, परिस्थिती गंभीर असून सरकारला लवकरात लवकर लष्कराला बोलावणे गरजेचे आहे. जर पी. व्ही. नरसिंह राव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला ऐकून आवश्यक कारवाई केली असती तर कदाचित 1984 चा नरसंहार होण्यापासून वाचला असता, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यावेळी म्हणाले. 

1984 मध्ये देशभर दंगली झाल्या होत्या1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची दोन शीख अंगरक्षकांकडून  हत्या झाल्यानंतर देशात शीखविरोधी दंगली उसळल्या होत्या. त्यामध्ये जवळपास 3,000 शिखांचा मृत्यू झाला होता. दिल्लीत जास्त दंगली उसळल्या होत्या. असे सांगण्यात येते की, 3,000 पैकी 2733 शिखांची हत्या दिल्लीत झाली होती.

2012 मध्ये गुजराल यांचे निधनदेशाचे 12 वे पंतप्रधान असलेल्या इंद्रकुमार गुजराल यांना अतिशय अल्प कालावधीसाठी पदावर राहता आले. इंद्रकुमार गुजराल हे 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998 या काळात देशाचे पंतप्रधान होते. 30 नोव्हेंबर 2012 मध्ये त्यांचे निधन झाले. 

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंग1984 Anti-Sikh Riots1984 शीखविरोधी दंगल