शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

EVM हॅकिंग: 'ती' पत्रकार परिषद काँग्रेसच्या सांगण्यावरूनच; भाजपाचे राहुल गांधीवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 13:25 IST

कथित EVM हॅकिंग प्रकरणावरून भाजपाने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्दे लंडनमधील ती पत्रकार परिषद काँग्रेस पुरस्कृतकाँग्रेसकडून 90 कोटी मतदारांचा अपमान आशीष रे यांचे काँग्रेसशी संबंध, आशीष रे यांनी लंडनमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतली

नवी दिल्ली -  कथित EVM हॅकिंग प्रकरणावरून भाजपानेकाँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लंडनमधील पत्रकार परिषद ही काँग्रेसने प्रायोजित केलेली होती. पत्रकार परिषदेचे आयोजक आशीष रे यांचे काँग्रेसशी संबंध असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची भेटही घेतली होती, असा आरोप भाजपाने केला आहे.  तसेच काँग्रेसने या प्रकरणातून देशातील 90 कोटी मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अपमान केला असून, देशाला जगात बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचे भाजपाने म्हटले आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये EVM हॅकिंग प्रकरणी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लंडनमधील ही पत्रकार परिषद काँग्रेसने प्रायोजित केलेली होती. तसे नसते तर  काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल लंडनमधील हॅकेथॉनमध्ये काय करत होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे राजकारण होत आहे, असेही प्रसाद यांनी सांगितले.  अशा आरोपबाजीमधून काँग्रेस 2019 साली होणाऱ्या पराभवाचे कारण शोधत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

रविशंकर प्रसाद यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे 

- लंडनमधील ती पत्रकार परिषद काँग्रेस पुरस्कृत- काँग्रेसकडून 90 कोटी मतदारांचा अपमान - काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल लंडनमधील हॅकेथॉनमध्ये काय करत होते-गोपीनाथ मुंडेच्या मृत्यूचे राजकारण - 2014 साली आमचं नाही यूपीएचं सरकार होते सत्तेवर- आशीष रे यांचे काँग्रेसशी संबंध - आशीष रे यांनी लंडनमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतली

लंडनमधील पत्रकार परिषदेत काय झाले होते आरोप

 भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM हॅक होत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून सातत्याने होत असतानाच या प्रकरणी एका अमेरिकन सायबर एक्सपर्ट्सने सोमवारी खळबळजनक दावा केला होता. 2014 साली भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये EVM हॅकिंग झाले होते. तसेच या EVM हॅकिंगबाबत कल्पना असल्यानेच भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, असा आरोप या सायबर एक्सपर्ट्सने केला.  सय्यद सुजा असे या सायबर एक्सपर्ट्सचे नाव असून त्याने लंडनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे दावे केले. लंडनमध्ये आयोजित एका हॅकेथॉनमध्ये त्याने EVM हॅक होऊ शकतात, असा दावा केला आहे. विशेष बाब म्हणजे काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल हे या हॅकेथॉनला सुरुवातीपासून उपस्थित होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी