शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

निसर्गापुढे सगळं थांबलय, सोनूने पहिल्यांदाच मोदी सरकारकडे केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 11:28 IST

मी स्वत: इंजिनिअर आहे, या परीक्षांसाठी विद्यार्थ्याना गाव-खेड्यातून आणि दुर्गम भागातून यावे लागते. सद्यस्थितीत बिहारच्या काही गावांमध्ये पूर आहे, तर कुठे जिल्हा बंदी. परीक्षा घेणे आवश्यक आहे, पण...

ठळक मुद्देमी स्वत: इंजिनिअर आहे, या परीक्षांसाठी विद्यार्थ्याना गाव-खेड्यातून आणि दुर्गम भागातून यावे लागते. सद्यस्थितीत बिहारच्या काही गावांमध्ये पूर आहे, तर कुठे जिल्हा बंदी. परीक्षा घेणे आवश्यक आहे, पण त्या विद्यार्थ्यांच्या जीवाचाही काळजी आपणच करायला हवी.

नवी दिल्ली  - नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एन्ट्रान्स एक्झाम पुढे ढकलण्याची मागणी जोर धरत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे लोकसभेतील गटनेता अधीर रंजन चौधरी यांनी या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली  होती. त्यानंतर, भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीचा सरकारला घरचा अहेर दिला आहे. तर, अभिनेता आणि आपल्या कामामुळे रिअल हिरो ठरलेल्या सोनू सूदनेही पंतप्रधान मोदींकडे परीक्षांसदर्भात मागणी केली आहे. 

इंजिनीअरिंग व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची जेईई व नीट या परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. जेईई मुख्य परीक्षा १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबरमध्ये होतील आणि परीक्षांचे निकाल सप्टेंबरच्या अखेरीस लागणार आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (एमबीबीएस, बीडीएस) नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार असून, तिचा निकाल ऑक्टोबर महिन्यात लागेल. मात्र, देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेस नेते व खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केली होती. त्यानंतर, ममता बॅनर्जी यांनीही हीच मागणी लावून धरली. आता, सुब्रमण्यम स्वामी यांनीही या मुद्द्यावरुन सराकरला लक्ष्य केले आहे.  आता, सोनू सूदनेही देशातील परिस्थिती आणि पूरस्थितीचा संदर्भ देत सद्यपरिस्थितीच JEE आणि NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. 

मी स्वत: इंजिनिअर आहे, या परीक्षांसाठी विद्यार्थ्याना गाव-खेड्यातून आणि दुर्गम भागातून यावे लागते. सद्यस्थितीत बिहारच्या काही गावांमध्ये पूर आहे, तर कुठे जिल्हा बंदी. परीक्षा घेणे आवश्यक आहे, पण त्या विद्यार्थ्यांच्या जीवाचाही काळजी आपणच करायला हवी. निसर्गापुढे जगभरात सर्वकाही थांबलय, म्हणूनच परीक्षा काही वेळेसाठी थांबायलाच हव्यात, असे ट्विट सोनूने केले आहे. बिहार, आसाम आणि गुजरातमधून 26 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत, पूरस्थितीत अडकलेल्या या विद्यार्थ्यांना सपोर्ट करायलाच हवा, असेही सोनूने म्हटलंय. 

सुब्रमण्यम स्वामींची मागणी

सद्यपरिस्थिती जेईई व नीट परीक्षा घेणे म्हणजे शहरातील श्रीमंत पालकांच्या मुलांची बाजू घेणे नाही का? सरकारच्या हे लक्षात येत नाही का? असा प्रश्न स्वामींनी विचारला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना लॉकडाऊनमुळे परीक्षांच्या तयारीसाठी मोठा त्रास सहन करावा लागला आहे. ना इंटरनेटची सुविधा, ना लायब्ररीला जाण्याची सोय. त्यामुळे, NEET अभ्यासही झाला नाही. पंतप्रधान नरेंद मोदी याबद्दल नक्कीच सहानुभूतीपूर्वक विचार करतील, असे ट्विटर सुब्रमण्यम स्वामींनी केले आहे.  

ममता बॅनर्जींची मागणी

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा नको, असे म्हणत सुरक्षित आणि निर्भय वातावरणात परीक्षा पार पडाव्या, असेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच, सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणाऱ्या NEET आणि जेईई परीक्षाही पुढे ढकलाव्यात अशी मागणीही बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.  

काँग्रेसचीही तीच मागणी

दरम्यान, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विनंती केली आहे. सप्टेंबर महिन्यात नियोजित वेळापत्रकानुसार होणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकल्यात याव्यात अशी मागणी चौधरी यांनी या पत्राद्वारे केली आहे. देशातील कोरोनाबाधितांची वाढती लोकसंख्या आणि कोरोना महामारीचं संकट लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करण्यात यावा. या महामारीच्या संकटात केवळ शारीरिकदृष्ट्याच नाही, तर मानसिकदृष्ट्याही तयार नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, या परीक्षा पुढे ढकल्यात याव्यात, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSonu Soodसोनू सूदNarendra Modiनरेंद्र मोदीexamपरीक्षाMedicalवैद्यकीय