शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सरकारच्या भूमिकेमुळे ईडी, आयकरची अडचण, सुप्रीम कोर्टात २ प्रकरणामध्ये बदललेल्या दृष्टिकोनामुळे सर्वांना आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 09:02 IST

Central Government: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांविरोधात ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईमुळे आणि विरोधकांच्या टीकेमुळे जनतेच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे का?

- संजय शर्मानवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांविरोधात ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईमुळे आणि विरोधकांच्या टीकेमुळे जनतेच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे का? ही चिंता आता सरकारलाही सतावत आहे काय? गेल्या ४८ तासांत सरकारच्या भूमिकेत झालेल्या बदलामुळे ईडी आणि आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी आश्चर्यचकित झाले.

केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली नसती तर आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला एकापाठोपाठ एक नोटीस पाठवून कारवाई केली नसती. सोमवार हा सर्वोच्च न्यायालयातील संस्मरणीय दिवस असेल. कारण, काँग्रेस पक्षाला पाठवलेल्या ३,५६७ कोटी रुपयांच्या आयकर नोटीसच्या सुनावणीदरम्यान सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, काँग्रेस पक्ष एक राजकीय पक्ष आहे. आयकर नोटीसवरील सुनावणी निवडणुकीनंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात यावी. आयकर विभागही आता कोणतीही कारवाई करणार नाही. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाचे वकील आणि नेते अभिषेक मनू सिंघवी यांना सर्वाधिक आश्चर्य वाटले. सिंघवी तर म्हणाले की, ते नि:शब्द आहेत.

संजय सिंह प्रकरणातही विरोध नाही आपचे खासदार संजय सिंह यांच्या प्रकरणात ईडीने सुप्रीम कोर्टात संजय सिंह यांच्या जामिनाला साधा विरोधही केला नाही. त्यामुळे संजय सिंह यांना सहज जामीन मिळाला. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना ईडीला विचारत राहिले की त्यांना संजय सिंह यांना आणखी कोठडीत ठेवायचे आहे का? पण ईडीच्या वकिलांनी एका शब्दानेही आक्षेप घेतला नाही.  

सरकारच्या भूमिकेत बदल?हे सर्व केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार होत असल्याची चर्चा आहे. कारण सॉलिसिटर जनरल तुषार मेहता किंवा ईडीचे वकील सरकारच्या सूचनेशिवाय एवढा मोठा निर्णय स्वत: घेऊ शकले नसते. सरकारच्या भूमिकेत बदल झाला असेल तर त्याचे परिणाम आणखीही दिसून येऊ शकतात, अशीही चर्चा आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारCBIगुन्हा अन्वेषण विभागEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय