शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

कॉलेज विद्यार्थी रोज १५० वेळा डोकावतात स्मार्टफोनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:41 AM

८० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे स्वत:चे मोबाइल फोन आहेत.

नवी दिल्ली : ‘मला वेड लागले प्रेमाचे' हे टाइमपास या मराठी चित्रपटातील गाजलेले गाणे. त्यातील शब्दांत थोडा बदल करुन ‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेड लागले स्मार्टफोनचे' असे म्हणायची वेळ आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी विविध कारणांनी रोज १५0 वेळा स्मार्टफोनमध्ये डोकावतात असा निष्कर्ष अलिगढ मुस्लिम विद्यापीठ व इंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्स रिसर्च (आयसीएसएसआर)ने केलेल्या पाहणीतून काढण्यात आला आहे.‘स्मार्टफोनवरील अवलंबित्व, त्याच्या खरेदीतील प्रवाह, चंगळवादी वृत्ती : डिजिटल इंडियासाठी चाललेल्या प्रयत्नांचे होत असलेले परिणाम' असा या पाहणीचा विषय होता. त्यासाठी देशभरातील २0 केंद्रीय विद्यापीठांमधील प्रत्येकी दोनशे विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.एखादी गोष्टीची माहिती आपल्याला नाही किंवा ती आपण जाणून घेतली नाही, असे या विद्यार्थ्यांना सतत वाटत असते. त्यामुळे ते रोज किमान १५0 वेळा स्मार्टफोनमध्ये डोकावतात, इंटरनेटवर अनेक गोष्टी पाहातात. त्याचा त्यांच्या आरोग्य व शैैक्षणिक प्रगतीवरही परिणाम होत आहे.80% टक्क्यांकडे स्वत:चे फोन८० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे स्वत:चे मोबाइल फोन आहेत. त्यातही विविध अ‍ॅप्लिकेशन व फीचर्ससाठी ते स्मार्टफोन वापरण्यासच प्राधान्य देतात. संगणकापेक्षा स्मार्टफोनवर काम करणे अधिक सोयीचे वाटत असल्यानेही त्याचा वापर अनेक विद्यार्थ्यांकडून होतो.आठ तास फोनवर पडीकपाहणीप्रकल्पाचे प्रमुख मोहम्मद नावेद खान यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यापैकी २८ टक्के विद्यार्थी हे केवळ कॉल करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतात. बाकीचे विद्यार्थी सोशल नेटवर्किंग साइटवर जाण्यासाठी तसेच गुगल सर्चमध्ये जाऊन अनेक गोष्टींची माहिती व मनोरंजनासाठी स्मार्टफोनमध्ये डोकावतात. 

टॅग्स :educationशैक्षणिकStudentविद्यार्थी