शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दर शनिवारी विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका, दिल्ली सरकारचे शाळांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 05:21 IST

शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय विद्यालय आणि दिल्ली सरकारने आपल्या शाळांना आदेश दिले आहेत. त्यानुसार दर शनिवारी पाचव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तरातून सूट मिळेल. शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांसोबत मौज मजा म्हणजेच आनंदवार साजरा करतील.

- एस. के. गुप्तानवी दिल्ली - शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय विद्यालय आणि दिल्ली सरकारने आपल्या शाळांना आदेश दिले आहेत. त्यानुसार दर शनिवारी पाचव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तरातून सूट मिळेल. शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांसोबत मौज मजा म्हणजेच आनंदवार साजरा करतील. त्या दिवशी वर्गांत फक्त चार तासांचे शिकवणे होईल. या दिवशी मुलांना दप्तराचे ओझे वाहून न्यावे लागणार नाही. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी तमिळनाडू मॉडल समोर ठेवून दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अनोखी उपाययोजना केली आहे.मानव संसाधन विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीने सांगितले की, दप्तराचे ओझे कमी करण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू होते. कोठारी आयोगापासून ते प्रोफेसर यशपाल समितीने दप्तराचे ओझे कमी करण्याच्या शिफारशी केल्या आहेत. आधीच्या सरकारांनीही याबाबत चर्चांचे आयोजन केले होते. परंतु, याबाबतीत तमिलनाडू राज्याने देशात सर्वांसमोर उत्तम उदाहरण ठेवले आहे. तेथे विद्यार्थ्याला त्याच्या दप्तरात पाच ते सात किंवा दहा वह्या-पुस्तके नव्हे तर एक पुस्तक व एक वही घेऊन शाळेत जावे लागते. हे पुस्तक आणि वही सगळ््या विषयांना एकत्र करून एक महिन्यासाठी बनवली गेलेली असते. अभ्यासक्रम वार्षिक असला तरी महिन्याच्या हिशेबाने ८ ते ९ पुस्तके तयार केली जातात. एका पुस्तकात सगळ््या विषयांचे धडे असतात. हे पुस्तक ८०० नव्हे तर २०० पानांचे असते. वर्गात लॉकर बनवायची गरज नाही की दप्तराचे ओझे वाहून न्यायची.नृत्य, चित्रकला,रायडिंग शिकवाकेंद्रीय विद्यालय संघटनचे अतिरिक्त आयुक्त (अकादमिक) यू. एन. खावरे म्हणाले की, नव्या शैक्षणिक सत्रात शाळांना त्यांनी शनिवारी प्राथमिक वर्गांना दप्तरातून सूट देण्यास सांगितले आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांना संगीत, नृत्य, नाटक, अभिनव लेखन, चित्रकला आदी उपक्रमांत शिक्षकांनी गुंतवावे. याशिवाय शाळांमध्ये इतर उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन झालेले क्लब्जनी (रायडिंग, एन्व्हायरमेंट इत्यादी) विद्यार्थ्यांत कौशल्य विकासासाठी त्यांना बागकाम, कविता लेखन, चित्रपट बनवणे, रेडिओ कार्यक्रम आदी उपक्रमांत गोडी निर्माण करावी.वजनाचा आरोग्यावर विपरित परिणामराजस्थानस्थित जालोरचे शिक्षक संदीप जोशी यांनी शाळकरी मुलांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी बरेच काम केले आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार राजस्थानात अनेक शाळांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काम सुरू केले आहे. जोशी यांनी अभ्यासातून दाखवून दिले की, लहान मुलांच्या नाजूक शरीरावर या ओझ्याचा विपरीत परिणाम होत असतो. मणक्याच्या हाडावर जास्त ओझे पडल्यामुळे विद्यार्थ्याचा अपेक्षित व योग्य विकास होत नाही. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाeducationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रGovernmentसरकार