शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रत्येक नागरिकाला सन्मानानं मरण्याचा अधिकार- सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 10:42 IST

इच्छामरणाच्या विषयावर सरन्यायाधीश जीपक मिश्रा यांचं महत्त्वपूर्ण विधान

पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी इच्छामरणाच्या मुद्यावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. कायद्याच्या तर्कानं पाहता, कोणतीही व्यक्ती आत्महत्या करू शकत नाही. मात्र प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं मरण्याचा अधिकार आहे, असं दीपक मिश्रा पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानमालेला संबोधित करताना म्हणाले. 'बॅलेन्सिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनल राईट्स' विषयावर आधारित व्याख्यानमालेला सरन्यायाधीश उपस्थित होते.एखादी व्यक्ती स्वत:साठी लिविंग विल तयार करू शकते, असं दीपक मिश्रा व्याख्यानमालेत म्हणाले. 'एखाद्या व्यक्तीला कधीही बरा न होणारा आजार झाला असेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीला इच्छामरण हवं असेल, तर ती व्यक्ती स्वत:साठी लिविंग विल तयार करु शकते. आपण शेवटचा श्वास कधी घ्यायचा, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. यासाठी त्या व्यक्तीवर कोणताही दबाव नसावा,' असं सरन्यायाधीशांनी म्हटलं. 9 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयानं दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं एक ऐतिहासिक निर्णय दिला होता. मरणासन्न व्यक्तीनं इच्छामरणासाठी लिहिलेल्या लिविंग विलला काही मार्गदर्शक सूचनांसह मंजुरी देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला होता. आपण शेवटचा श्वास कधी घ्यावा, हे ठरवण्याचा अधिकार मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीला आहे, असं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं होतं. त्याच निकालाचा संदर्भ सरन्यायाधीशांनी व्याख्यानमालेत बोलताना दिला. प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं मरण्याचा पूर्ण अधिकार आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.  

टॅग्स :Deathमृत्यूDeepak Mishraदीपक मिश्राSupreme Courtसर्वोच्च न्यायालय