शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
5
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
6
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
7
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
8
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
9
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
10
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
11
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
12
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
13
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
14
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
15
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
16
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
17
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
18
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
19
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
20
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ताबदल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 05:25 IST

अजब राज्य : सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल देण्याची परंपरा यंदाही कायम राहणार?

सुहास शेलारजयपूर : गेल्या २५ वर्षांत राजस्थानच्या जनतेने सतत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिला आहे. १९९३ मध्ये भैरोसिंह शेखावत, १९९८ मध्ये अशोक गेहेलोत, २००३ मध्ये वसुंधरा राजे, २००८ पुन्हा अशोक गेहेलोत आणि २०१३ साली पुन्हा वसुंधराराजे असा सत्ताबदल झाला. यंदा निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून सरकारविरोधी सूर दिसत आहे. त्यामुळे १८० जागा निवडून आणण्याचा दावा करणाºया मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासमोर पुन्हा सत्ता राखण्याचे आव्हान आहे.

अ‍ॅट्रॉसिटीचे सर्वाधिक गुन्हे नोंद होणाºया राज्यांत राजस्थानची गणना होते. ते कमी करण्यासाठी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान असलेल्या वसुंधरा राजे सरकारने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे दलित-आदिवासींमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड संतापाचे वातावरण आहे. गोमांस विक्री व सेवनाच्या मुद्द्यावरून राजस्थानात झुंडबळीच्या अनेक घटना घडल्या. त्या रोखण्याऐवजी मुख्यमंत्री वसुंधराराजे व त्यांच्या सरकारमधील काहींनी त्याचे अप्रत्यक्ष समर्थनच केले. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजातही सरकारविषयी रोष आहे. परिणामी ही निवडणूक वसुंधरा राजे यांना कटकटीची ठरणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इतके मोठे राज्य काँग्रेसच्या हाती जाणे महागात पडू शकते, याचा अंदाज भाजपाला आहे. त्यामुळे अमित शहांनी आपली ‘फौज’ राजस्थानात उतरवली आहे. ती स्थानिक मतदारांचा आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचा कौल लक्षात घेऊन संभाव्य उमेदवारांची चाचपणी करीत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचार कसा करावा? याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे.

राजस्थानी जनतेचा सूर विद्यमान लोकप्रतिनिधींविरोधात आहे, हे शेतकरी, गुज्जर समाज, राजपूत व जाटांनी केलेल्या आंदोलनांतून दिसून आले आहे. त्यामुळे नवे चेहेरे देऊन मतदारांची नाराजी दूर करणे अणि पक्षात दीर्घकाळापासून काम करणाºया कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांचाही राग शांत करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. यासाठी आमदार-खासदारांच्या कामाचा फिडबॅक सातत्याने घेतला जात आहे. नमो अ‍ॅपद्वारेही माहिती गोळा केली जाते आहे. या अ‍ॅपवर मतदारांनी आपल्या आमदार-खासदारांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी मांडल्या आहेत. त्यामुळे विद्यमान १६३ आमदारांपैकी ८० ते ९० जणांचे तिकिट कापले जाण्याची शक्यता आहे.राजस्थानमधील सर्व २५ जागांवर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला होता. त्यावेळी मोदी लाट, काँग्रेसच्याविरोधी वातावरण वसुंधराराजे सरकारच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांचा प्रभाव मतदारांवर होता. मात्र, हवा पालटल्याचा प्रत्यय राजस्थानातील पोटनिवडणुकीतून आला. अजमेर व अलवर या लोकसभेच्या दोन आणि मांडलगड या विधानसभेच्या एका जागेवर भाजपाला पाणी सोडावे लागले. या जागा जिंकून काँग्रेसने ‘राजस्थानात पुढचे सरकार आमचेच’, असा नारा लगावला. या सगळ्या घडामोडी, तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक व नंतर लगेचच आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेत अमित शहा यांनी बुथ स्तरावर संघटना मजबूत करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.आणखी एका आमदाराचा राजीनामाराजस्थानमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने पहिल्या यादीतून वगळल्याने संतप्त झालेले आमदार हबिबूर रहमान यांनी मंगळवारी राजीनामा दिला. पाचवेळा भाजपचे आमदार व राज्यमंत्री असलेले सुरेंद्र गोयल यांनी उमेदवारी न मिळाल्याने सोमवारी राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसºयाच दिवशी रहमान यांनीही बंडाचा झेंडा उभारला.डुंगरपूर येथील भाजप आमदार देवेंद्र कटरा यांचाही पत्ता कापण्यात आला असून ते आपल्या समर्थकांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतील. राजस्थान ७ डिसेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या २०० पैकी १३१ उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये विद्यमान ८७ आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले असून २६ जणांना मात्र वगळण्यात आले आहे.

 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानElectionनिवडणूक