शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर केरळमधील शाळेची घंटा वाजली, पंधरवड्यानंतर शाळा अन् महाविद्यालये पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 06:38 IST

विमाने व प्रवाशांनी कोची विमानतळही गजबजला

तिरुवनंतपुरम : पुराच्या थैमानामुळे मोठी हानी झालेल्या केरळमध्ये आता स्थिती काहीशी पूर्वपदावर येत असून तिथे पंधरवड्यानंतर शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु झाली. पुराचे पाणी घुसल्याने १४ आॅगस्टपासून बंद असलेला कोची विमानतळही सुरू झाला असून तेथे दुपारी दोन वाजता पहिले विमान उतरले.

घरे उद्धवस्त झाल्याने १० लाखांहून अधिक लोक विस्थापीत झाले. त्यांच्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयांत जाणेही शक्य नव्हते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तसेच पुराचे पाणी ओसरल्यानंतर राज्यातील शाळा, कॉलेजांची सफाई मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली. पाणी घुसल्याने अनेक शाळांच्या इमारतींचे व आतील फर्निचर तसेच पाठ्यपुस्तकांसह शालेय साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.शिक्षणमंत्री प्रा. सी. रवींद्रनाथ यांनी सांगितले की, पुरामुळे राज्यातील ६५० शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातील काही शाळा उघडण्यास अजूनही उशीर लागणार असल्याने निवारा शिबिरांमध्येच मुलांचे वर्ग घेतले जात आहेत. मात्र येत्या ३ सप्टेंबरपासून सर्व शाळा पूर्वीप्रमाणेच सुरू होतील. अजूनही १.५ लाख विद्यार्थी निवारा शिबिरांमध्येच राहात आहेत. पुरामुळे ज्या मुलांची पाठ्यपुस्तके व गणवेश पूर्णपणे खराब झाले असतील किंवा हरवले असतील त्यांना ते नवे दिले जातील, असे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे. बंद असलेल्या कोची विमानतळावर बुधवारी पहिले विमान दुपारी दोन वाजता उतरले. ते होते अहमदाबाद ते कोची या मार्गावरील इंडिगो कंपनीचे. त्यानंतर विमानांची नियमित ये-जा सुरु झाली.पूरग्रस्तांना केंद्राची मदत अपुरी - राहुलकेरळमधील पूरग्रस्तांना पुरेशी मदत न दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, यूएईकडून केरळला मदत मिळण्याची शक्यता असून ती स्वीकारावी असे आपले मत आहे. जर पूरग्रस्तांना कोणी विनाशर्त मदत करत असेल तर ती घ्यायला काहीच हरकत नाही. राहुल गांधी केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. पुरेशी मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेस केंद्र सरकारवर दबाव आणेल असेही त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना सांगितले.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळSchoolशाळा