शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

अखेर केरळमधील शाळेची घंटा वाजली, पंधरवड्यानंतर शाळा अन् महाविद्यालये पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 06:38 IST

विमाने व प्रवाशांनी कोची विमानतळही गजबजला

तिरुवनंतपुरम : पुराच्या थैमानामुळे मोठी हानी झालेल्या केरळमध्ये आता स्थिती काहीशी पूर्वपदावर येत असून तिथे पंधरवड्यानंतर शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु झाली. पुराचे पाणी घुसल्याने १४ आॅगस्टपासून बंद असलेला कोची विमानतळही सुरू झाला असून तेथे दुपारी दोन वाजता पहिले विमान उतरले.

घरे उद्धवस्त झाल्याने १० लाखांहून अधिक लोक विस्थापीत झाले. त्यांच्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयांत जाणेही शक्य नव्हते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तसेच पुराचे पाणी ओसरल्यानंतर राज्यातील शाळा, कॉलेजांची सफाई मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली. पाणी घुसल्याने अनेक शाळांच्या इमारतींचे व आतील फर्निचर तसेच पाठ्यपुस्तकांसह शालेय साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.शिक्षणमंत्री प्रा. सी. रवींद्रनाथ यांनी सांगितले की, पुरामुळे राज्यातील ६५० शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातील काही शाळा उघडण्यास अजूनही उशीर लागणार असल्याने निवारा शिबिरांमध्येच मुलांचे वर्ग घेतले जात आहेत. मात्र येत्या ३ सप्टेंबरपासून सर्व शाळा पूर्वीप्रमाणेच सुरू होतील. अजूनही १.५ लाख विद्यार्थी निवारा शिबिरांमध्येच राहात आहेत. पुरामुळे ज्या मुलांची पाठ्यपुस्तके व गणवेश पूर्णपणे खराब झाले असतील किंवा हरवले असतील त्यांना ते नवे दिले जातील, असे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे. बंद असलेल्या कोची विमानतळावर बुधवारी पहिले विमान दुपारी दोन वाजता उतरले. ते होते अहमदाबाद ते कोची या मार्गावरील इंडिगो कंपनीचे. त्यानंतर विमानांची नियमित ये-जा सुरु झाली.पूरग्रस्तांना केंद्राची मदत अपुरी - राहुलकेरळमधील पूरग्रस्तांना पुरेशी मदत न दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, यूएईकडून केरळला मदत मिळण्याची शक्यता असून ती स्वीकारावी असे आपले मत आहे. जर पूरग्रस्तांना कोणी विनाशर्त मदत करत असेल तर ती घ्यायला काहीच हरकत नाही. राहुल गांधी केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. पुरेशी मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेस केंद्र सरकारवर दबाव आणेल असेही त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना सांगितले.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळSchoolशाळा