शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

तेव्हाचेही पंतप्रधान मणिपूरला गेले नव्हते; गृहमंत्री अमित शाह यांनी विराेधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 06:14 IST

मणिपूरमधील हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप दु:खी झाले. हिंसाचार सुरू झाला त्या दिवशी पहाटे चार वाजता मोदी यांनी मला फोन करून सर्व घटनेची माहिती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव, इंद्रकुमार गुजराल यांच्या कार्यकाळात तसेच यूपीएचे सरकार असताना मणिपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. तेव्हा त्यावेळच्या पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत कोणतेही निवेदन केले नव्हते. तेव्हाही कोणीही पंतप्रधान मणिपूरमध्ये गेले नव्हते असे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 

अमित शाह म्हणाले की, मणिपूरमधील हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप दु:खी झाले. हिंसाचार सुरू झाला त्या दिवशी पहाटे चार वाजता मोदी यांनी मला फोन करून सर्व घटनेची माहिती घेतली. मी स्वत: तीन दिवस मणिपूरला गेलो होतो. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय २३ दिवस त्या राज्यात तळ ठोकून होते. मणिपूरच्या राज्य सरकारने हिंसाचार रोखण्यात केंद्र सरकारला संपूर्ण सहकार्य देऊ केले. त्यामुळे सरकार बरखास्तीसाठी असलेले कलम ३५६ वापरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अमित शाह यांनी सांगितले की, केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे.

यूपीएने केला भ्रष्ट मार्गाचा अवलंबअमित शाह म्हणाले की, आपले सरकार काहीही करून वाचविण्यासाठी यूपीएने भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब केला. १९९३ साली काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारवर अविश्वास ठराव आला असता काँग्रेसने गैरमार्गांचा अवलंब करून ते सरकार टिकविले. नरसिंहराव सरकारविरोधी अविश्वास ठराव फेटाळला गेला; पण झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना तुरुंगात जावे लागले. नरसिंहराव यांनाही तुरुंगात जावे लागले. आता तीच काँग्रेस व झामुमाे एकत्र बसले आहेत. 

‘राहुल गांधी यांचे झाले १३ वेळा लाँचिंग’राहुल गांधी यांचे नाव न घेता अमित शाह यांनी सांगितले की, काँग्रेसच्या एका नेत्याचे आतापर्यंत १३वेळा राजकारणात लाँचिंग करण्यात आले आहे. कलावती नावाच्या महिलेच्या घरी राहुल गांधी जेवून आले. त्या महिलेला राहण्यासाठी पक्के घर, स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी मोदी सरकारने दिली आहे असेही शाह म्हणाले.

राहुल गांधी म्हणजे भारत नाहीमणिपूर हा वेगळा झाला नसून तो देशाचा अविभाज्य भाग आहे आणि ताे भारताचाच भाग राहिल. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे असे वक्तव्य भारतीय संसदीय लोकशाहीमध्ये  प्रथमच कोणीतरी केले व त्या वक्तव्यावर काँग्रेसच्या सदस्यांनी बाके वाजविली. राहुल, तुम्ही म्हणजे भारत देश नाही हे लक्षात ठेवा.  लक्षात ठेवा नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत.    - स्मृती इराणी, महिला     व बालकल्याण मंत्री 

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNo Confidence motionअविश्वास ठराव