शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

तेव्हाचेही पंतप्रधान मणिपूरला गेले नव्हते; गृहमंत्री अमित शाह यांनी विराेधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 06:14 IST

मणिपूरमधील हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप दु:खी झाले. हिंसाचार सुरू झाला त्या दिवशी पहाटे चार वाजता मोदी यांनी मला फोन करून सर्व घटनेची माहिती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव, इंद्रकुमार गुजराल यांच्या कार्यकाळात तसेच यूपीएचे सरकार असताना मणिपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. तेव्हा त्यावेळच्या पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत कोणतेही निवेदन केले नव्हते. तेव्हाही कोणीही पंतप्रधान मणिपूरमध्ये गेले नव्हते असे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 

अमित शाह म्हणाले की, मणिपूरमधील हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप दु:खी झाले. हिंसाचार सुरू झाला त्या दिवशी पहाटे चार वाजता मोदी यांनी मला फोन करून सर्व घटनेची माहिती घेतली. मी स्वत: तीन दिवस मणिपूरला गेलो होतो. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय २३ दिवस त्या राज्यात तळ ठोकून होते. मणिपूरच्या राज्य सरकारने हिंसाचार रोखण्यात केंद्र सरकारला संपूर्ण सहकार्य देऊ केले. त्यामुळे सरकार बरखास्तीसाठी असलेले कलम ३५६ वापरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अमित शाह यांनी सांगितले की, केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे.

यूपीएने केला भ्रष्ट मार्गाचा अवलंबअमित शाह म्हणाले की, आपले सरकार काहीही करून वाचविण्यासाठी यूपीएने भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब केला. १९९३ साली काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारवर अविश्वास ठराव आला असता काँग्रेसने गैरमार्गांचा अवलंब करून ते सरकार टिकविले. नरसिंहराव सरकारविरोधी अविश्वास ठराव फेटाळला गेला; पण झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना तुरुंगात जावे लागले. नरसिंहराव यांनाही तुरुंगात जावे लागले. आता तीच काँग्रेस व झामुमाे एकत्र बसले आहेत. 

‘राहुल गांधी यांचे झाले १३ वेळा लाँचिंग’राहुल गांधी यांचे नाव न घेता अमित शाह यांनी सांगितले की, काँग्रेसच्या एका नेत्याचे आतापर्यंत १३वेळा राजकारणात लाँचिंग करण्यात आले आहे. कलावती नावाच्या महिलेच्या घरी राहुल गांधी जेवून आले. त्या महिलेला राहण्यासाठी पक्के घर, स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी मोदी सरकारने दिली आहे असेही शाह म्हणाले.

राहुल गांधी म्हणजे भारत नाहीमणिपूर हा वेगळा झाला नसून तो देशाचा अविभाज्य भाग आहे आणि ताे भारताचाच भाग राहिल. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे असे वक्तव्य भारतीय संसदीय लोकशाहीमध्ये  प्रथमच कोणीतरी केले व त्या वक्तव्यावर काँग्रेसच्या सदस्यांनी बाके वाजविली. राहुल, तुम्ही म्हणजे भारत देश नाही हे लक्षात ठेवा.  लक्षात ठेवा नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत.    - स्मृती इराणी, महिला     व बालकल्याण मंत्री 

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNo Confidence motionअविश्वास ठराव