शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

सर्जिकलनंतरही खो-यात अतिरेक्यांचे थैमान, हिंसाचारात मृत्यू होण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 2:26 AM

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी भारताच्या लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात मृत्यू होण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले आहे.

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी भारताच्या लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात मृत्यू होण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले आहे. नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट फॉर कॉनफ्लिक्ट मॅनेजमेंटच्या वतीने चालवल्या जात असलेल्या साऊथ अशिया टेररिझम पोर्टलच्या (एसएटीपी) माहितीचे इंडियास्पेन्डने केलेल्या विश्लेषणात म्हटले आहे की, दहशतवादाशी संबंधित मृत्यू २०१५-२०१६मध्ये २४६ होते तर २०१६-२०१७मध्ये (२४ सप्टेंबर २०१७पर्यंत) ३२३ होते.याचाच अर्थ असा की, सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू आणिकाश्मीरमध्ये घुसखोरी व दहशतवादी हल्ले याचे प्रमाण कमी झाले नसून, त्यात वाढच झाली आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गरज भासली तर आणखी सर्जिकल स्ट्राइक्स होऊ शकतात, असे संकेत मध्यंतरी दिले. पण त्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही.आम्हाला काय म्हणायचे आहे याचा संदेश सर्जिकल स्ट्राइकद्वारे त्यांना दिला गेला आणि तो त्यांना समजलाही, असे रावत २५ सप्टेंबर २०१७ रोजी म्हणाले होते. रावत म्हणाले होते की, ‘‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण छावण्या सुरूच असल्यामुळे भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू आहे.’’प्रसारमाध्यमांतील वृत्तान्तांवरून एसएटीपीने ही मृत्यूबद्दलची माहिती गोळा केली असून, ती २४ सप्टेंबरपर्यंतची आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार मारण्याच्या प्रमाणात २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१५-२०१६मध्ये १५७ दहशतवादी ठार मारले होते तर १९४ जणांना २०१६-२०१७मध्ये ठार मारण्यात आले.- दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात सुरक्षा दलांचे जवान मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण २०१५-२०१६मध्ये ७० होते तर २०१६-२०१७मध्ये ७७ जवान ठार झाले. दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात नागरिक मरण पावण्याचे प्रमाण २०१६-२०१७मध्ये ५२ होते तर २०१५-२०१६मध्ये १० नागरिक ठार झाले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्कर