शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

नाराजीनंतरही भाजप देईना भाव, वरून गांधी काँग्रेसच्या मार्गावर जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 09:38 IST

वरुण गांधी आणि त्यांची आई मेनका गांधी यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे. यामुळेच त्यांचा हटविण्यात आल्याची चर्चा आहे. खरे तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मेनका गांधी यांना मंत्री करण्यात आले नाही. तेव्हापासूनच हा दुरावा दिसू लागला आहे.

नवी दिल्ली - भाजप खासदार वरुण गांधी (varun gandhi) आणि पक्षातील अंतर वाढताना दिसत आहे. कधी काळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहिलेल्या वरुण गांधींकडे गेल्या काही दिवसांपासून दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना ना पक्षात महत्वाची जागा मिळत आहे, ना केंद्र सरकारमध्ये स्थान मिळाले आहे. आता लखीमपूर खेरी प्रकरणाबरोबरच, भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निर्मिती तर वरुण यांच्या नाराजीचे कारण नाही? अशी चर्चा राकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वरुण गांधी आणि मेनका गांधी दोघांनाही स्थान मिळालेले नाही. यापूर्वी हे दोन्ही नेते यात होते. असेही नवी कार्यकारिणी तयार करताना 25 ते 30 टक्के सदस्य बदले जातातच आणि यावेळीही भाजपने अनेक मुख्य चेहरे बदलले आहेत.

वरुण गांधी आणि त्यांची आई मेनका गांधी यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे. यामुळेच त्यांचा हटविण्यात आल्याची चर्चा आहे. खरे तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मेनका गांधी यांना मंत्री करण्यात आले नाही. तेव्हापासूनच हा दुरावा दिसू लागला आहे. वरुण गांधीही संघटनेच्या कामातही अधिक रस घेत नव्हते. एवढेच नाही, तर नुकतेच आपण कार्यकारिणीमध्ये होतो, की नाही हेही आपल्याला माहीत नाही, हे त्यांचे वक्तव्यही चर्चेचा विषय बनले होते.

आता उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जवळ आली असतानाच, वरून गांधी यांची विधाने भाजपला अस्वस्थ करणारी आहेत. मात्र, असे असले तरी भाजपही वरूण गांधी यांच्या वक्तव्यांना फारशी किंमत देताना दिसत नाही. त्यांच्या कुठल्याही वक्तव्यावर प्रतिक्रियाही दिली जात नाही. यावरून स्पष्ट आहे, की भाजप वरून गांधी यांना फारसे गांभीर्याने घेत नाही.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीManeka Gandhiमनेका गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस