शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे झाली तरी देशद्रोहाच्या कायद्याची गरज आहे का?; सरन्यायाधीशांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 05:47 IST

केंद्र सरकारचे मत मागविले, जारी केली नोटीस. देशद्रोहविषयक कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी नवी याचिका करण्यात आली आहे दाखल.

ठळक मुद्देकेंद्र सरकारचे मत मागविले, जारी केली नोटीस.देशद्रोहविषयक कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी नवी याचिका करण्यात आली आहे दाखल.

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांचा आवाज दडपण्यासाठी ब्रिटिशांनी देशद्रोहाच्या कायद्याचा वापर केला होता. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असून अजूनही या वसाहतवादी कायद्याची आवश्यकता आहे का असा सवाल सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केंद्र सरकारला केला. या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचे मत मागविले असून तशी नोटीसही जारी केली.

देशद्रोहविषयक कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी नवी याचिका दाखल झाली आहे. तिच्या सुनावणीप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशद्रोहाचा कायदा म्हणजे सुताराच्या हातात करवत देण्यासारखे आहे. तो त्या हत्याराने सारे जंगलच कापून टाकेल. तशाच रीतीने देशद्रोहाच्या कायद्याचाही गैरवापर होण्याची शक्यता आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ अन्वये देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला आहे असे ऐकताच संबंधित आरोपी भयभीत होतो. या कायद्याचा वापर करणाऱ्या यंत्रणांच्या उत्तरदायित्वाचाही मुद्दा महत्त्वाचा आहे. 

देशद्रोहाच्या कायद्यामुळे विचार व भाषण स्वातंत्र्य या मूलभूत हक्कांवर गदा येते असे निवृत्त मेजर जनरल एस. जी. वोम्बटकेरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. देशद्रोहाचा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) द्वारे प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या विचार स्वातंत्र्याचा देशद्रोही कायद्यामुळे संकोच होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कायदा रद्द व्हायला पाहिजे. भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ बद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सध्याचा काळ व कायद्याचा विकास या दोन्ही गोष्टींचा विचार करावा. याआधी देशद्रोहाच्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला दोन पत्रकारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या वेगळ्या खंडपीठाने केंद्राकडे या कायद्याबद्दलचे मत मागविले होते. 

लोकमान्य टिळकांवरही उगारला होता बडगासर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील स्वातंत्र्य आंदोलन चिरडण्यासाठी ब्रिटिशांनी देशद्रोहाच्या कायद्याचा वापर केला. लोकमान्य टिळकांपासून अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या विरोधात ब्रिटिश सरकारने या कायद्याचा बडगा उगारला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकारN V Ramanaएन. व्ही. रमणाLokmanya Tilakलोकमान्य टिळक