शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:03 IST

Operation Sindoor: भारताने पाकिस्तानात जाऊन काही केले नाही, असे आफ्रिकेतील एका देशाच्या राजदूतांनी म्हटले आहे.

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ स्थगित केले आहे, संपलेले नाही, असेही भारताने स्पष्ट केले आहे. यानंतर आता भारतातील खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील देशांमध्ये जाण्यासाठी रवाना होत असून, भारताची बाजू भक्कमपणे जागतिक मंचावर मांडली जाणार आहे. यातच आफ्रिकेतील एका देशाने आता भारताला समर्थन दिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी धाडसी नेतृत्व असल्याचे म्हटले आहे. 

पूर्व आफ्रिकेतील इथियोपियाचे भारतातील राजदूत फेसेहा शॉवेल गेब्रे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत प्रतिक्रिया दिली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा इथियोपिया निषेध करतो. पंतप्रधान मोदी हे धाडसी आहेत. पाकिस्तानने केलेल्या कुरापतींना भारताने जबाबदारीने प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानात जाऊन काही केले नाही. पाकिस्तानने भारतात समस्या निर्माण केल्या. पाकिस्तानमधील दहशतवादी भारतात आले होते. हे खूपच भयंकर आणि अस्वीकार्य आहे. त्यांनी धर्माच्या आधारावर लोकांचे वर्गीकरण करून त्यांना ठार मारले. ज्याप्रमाणे भारत सध्या दहशतवादाशी दोन हात करत आहे, त्याचप्रमाणे इथियोपिया पूर्व आफ्रिकेतील दहशतवादाविरोधात संघर्ष करतो, असे गेब्रे यांनी म्हटले आहे. 

भारत सर्वांसाठी चांगला आहे 

पुढे बोलताना ते म्हणाले की, इथिओपियामध्ये हिंदू नाहीत, ख्रिश्चन आणि मुस्लिम समान संख्येने आहेत. पण तरीही ते योगासने करतात. ते ध्यानधारणा, प्रार्थना करतात. तुम्ही जगात कुठेही गेलात आणि 'योग' हा शब्द उच्चारलात तर लोकांना तुम्ही कशाबद्दल बोलत आहात हे कळते. जसे भारतीयांनी जगाला योग दिला आहे, तसेच इथिओपियाने कॉफी दिली आहे. आम्ही योग आणि कॉफीचा एकत्रितपणे प्रचार करू. भारत सर्वांसाठी चांगला आहे. आपल्याला भारताकडून खूप काही शिकण्याची गरज आहे, असेही गेब्रे यांनी नमूद केले.

दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’वर भारताची भूमिका जागतिक स्तरावर मांडण्यासाठी जाणाऱ्या तीन शिष्टमंडळांना सदस्यांना परराष्ट्र सचिव विक्रम मिसी यांनी पाकिस्तानच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या भारतविरोधी दहशतवादी कारवायांसंदर्भात सविस्तर माहिती दिली. भारत कोणत्याही हल्ल्यास ठोस उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान