शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

सम-विषम योजना दिल्लीत पुन्हा सुरू होणार

By admin | Updated: January 17, 2016 02:05 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीचे सरकार राजधानी दिल्लीत पुन्हा सम-विषम योजना सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करीत असून पुढील महिन्यात

- शीलेश शर्मा, नवी दिल्लीमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीचे सरकार राजधानी दिल्लीत पुन्हा सम-विषम योजना सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करीत असून पुढील महिन्यात यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ ते १५ जानेवारी या कालावधीत राबविण्यात आलेल्या सम-विषम योजनेला दिल्लीकर आणि सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे केजरीवाल यांचा उत्साह वाढला आहे. या काळात प्रदूषणाचा स्तर भलेही कमी झाला नसेल पण दिल्लीच्या रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक जामपासून मात्र येथील लोकांचा मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेला मिळणाऱ्या भरघोस पाठिंब्यामागे हेच मुख्य कारण आहे. निम्म्यावर लोकांचा पाठिंबाताज्या सर्वेक्षणानुसार दिल्लीतील ५४ टक्के लोकांनी योजनेला पाठिंबा देताना त्याची प्रशंसा केली आहे. तर २१ टक्के नागरिकांनी सम-विषमला विरोध केला आहे. २५ टक्के लोकांनी कुठलेही मत व्यक्त केलेले नाही. दुसरीकडे प्रदूषणात झालेल्या घटाबद्दल वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. हिवाळा नसता तर या योजनेचे ठोस परिणाम समोर आले असते, असा दावा पर्यावरण विशेषज्ञ सुनीता नारायण यांनी केला होता तर प्रदूषण कमी होण्याऐवजी आणखी वाढले असल्याचा युक्तिवाद अनेक संस्थांनी केला आहे. सम-विषय योजनेमुळे दिल्लीत पेट्रोल, डिझेलच्या वापराचे प्रमाण कमी झाले असल्याचे अन्य एका सर्वेक्षणात सांगण्यात आले. एका पेट्रोल पंपावर दररोज तीन टॅँकर विक्री होत होती. सम-विषममुळे ती दोन टँकरवर आली आहे. एका टँकरमध्ये २० हजार लिटर पेट्रोल असते आणि दिल्लीत हजारो पेट्रोल पंप आहेत. तेव्हा दररोज किती पेट्रोलची बचत होत असेल याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. वाया जाणारअया इंधनाचे प्रमाणही कमी झाले आहे.