शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अकरा महीन्यांपूर्वी 16 वर्षीय मुलाचा एनकाउंटर, अद्याप कुटुंबाला मिळाला नाही मृतदेह; काय आहे प्रकरण...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 09:12 IST

11 महिन्यांपूर्वी अतहर मुश्ताक नावाच्या 16 वर्षीय मुलाचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला होता.

श्रीनगर: गेल्या 11 महिन्यांपासून एक पिता आपल्या मुलाच्या मृतदेहाची वाट पाहत आहे. मात्र सतत प्रयत्न करुनही पदरी निराशाच पडतीय. 16 वर्षीय अतहर मुश्ताक 29 डिसेंबर 2020 नंतर घरी परतला नाही. वडील मुश्ताक अहमद वाणी यांना नंतर कळले की, मुलगा पोलिसांच्या चकमकीत मारला गेला आहे. तेव्हापासून आजतागायत मुश्ताक वाणी हे आपल्या मुलाच्या मृतदेहाची मागणी करत आहेत. चकमकीची माहिती मिळाल्यानंतर अतहरच्या वडिलांनी 11 महिन्यांपूर्वी आपल्या मुलासाठी कबर खोदली होती, परंतु ते अजूनही मुलाच्या मृतदेहाची वाट पाहत आहेत.

चकमकीत मृत्यूमुश्ताक अहमद वाणी सांगतात की, त्यांचा मुलगा अतहर मुश्ताक हा 11वीचा विद्यार्थी होता. त्याची परीक्षा सुरू होती, 29 डिसेंबरपर्यंत त्याने चार पेपर दिले होते. परीक्षेदरम्यान त्याला दुपारी दोन वाजता उचलण्यात आले. त्यानंतर काय झाले हे आम्हाला माहीत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता त्याचा मृतदेह पोलिस नियंत्रण कक्षात पडून होता. त्याचा चकमकीत मृत्यू झाला, एवढंच आम्हाला सांगण्यात आलं.

पोलिसांनी परस्पर पुरला मृतदेहअतहर त्याच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी जात असताना श्रीनगरजवळील लवेपोरा येथे झालेल्या चकमकीत इतर दोन तरुणांसह मारला गेला. बोर्डाच्या निकालानुसार अतहर त्याच्या शेवटच्या पेपरला गैरहजर होता. कुटुंबाचे म्हणणे आहे की, घर सोडल्यानंतर तीन तासांनंतर अतहरला चकमकीत मारण्यात आले. पोलिसांनी त्याचा मृतदेह सोनमर्ग येथे पुरला होता. पण, आजपर्यंत अतहरच्या वडिलांना त्याचा मृतदेह दिसला नाही.

दहशतवादी असल्याचा दावापरीक्षेच्या शेवटच्या पेपरआधी त्याची हत्या झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. ते सांगतात की, मी त्याच्या मृतदेहाची मागणी करून थकलो आहे, पण कोणी ऐकत नाही. ही चकमक झाली तेव्हा त्याबाबत पोलिसांची वेगवेगळी वक्तव्ये होती. यापूर्वी पोलिसांनी सांगितले होते की, चकमकीत मारले गेलेले तीन लोक पोलिस रेकॉर्डमध्ये दहशतवादी म्हणून सूचीबद्ध नाहीत. मात्र दोनच दिवसांनंतर पोलिसांनी हे तिघे दहशतवाद्यांचे साथीदार असल्याचा दावा केला.

अशाप्रकारची अनेक प्रकरणे आहेतपोलिसांनी सुनियोजित पद्धतीने चकमकीत मारल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. ठार झालेल्या तिघांपैकी एक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. या पद्धतीची आणखी प्रकरणे समोर आली असून, त्यातही मृतांच्या कुटुंबीयांना मृतदेह मिळाले नाहीत. आजही अनेक कुटुंबे मृतदेह मिळण्याची वाट पाहत आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस