शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

अकरा महीन्यांपूर्वी 16 वर्षीय मुलाचा एनकाउंटर, अद्याप कुटुंबाला मिळाला नाही मृतदेह; काय आहे प्रकरण...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 09:12 IST

11 महिन्यांपूर्वी अतहर मुश्ताक नावाच्या 16 वर्षीय मुलाचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला होता.

श्रीनगर: गेल्या 11 महिन्यांपासून एक पिता आपल्या मुलाच्या मृतदेहाची वाट पाहत आहे. मात्र सतत प्रयत्न करुनही पदरी निराशाच पडतीय. 16 वर्षीय अतहर मुश्ताक 29 डिसेंबर 2020 नंतर घरी परतला नाही. वडील मुश्ताक अहमद वाणी यांना नंतर कळले की, मुलगा पोलिसांच्या चकमकीत मारला गेला आहे. तेव्हापासून आजतागायत मुश्ताक वाणी हे आपल्या मुलाच्या मृतदेहाची मागणी करत आहेत. चकमकीची माहिती मिळाल्यानंतर अतहरच्या वडिलांनी 11 महिन्यांपूर्वी आपल्या मुलासाठी कबर खोदली होती, परंतु ते अजूनही मुलाच्या मृतदेहाची वाट पाहत आहेत.

चकमकीत मृत्यूमुश्ताक अहमद वाणी सांगतात की, त्यांचा मुलगा अतहर मुश्ताक हा 11वीचा विद्यार्थी होता. त्याची परीक्षा सुरू होती, 29 डिसेंबरपर्यंत त्याने चार पेपर दिले होते. परीक्षेदरम्यान त्याला दुपारी दोन वाजता उचलण्यात आले. त्यानंतर काय झाले हे आम्हाला माहीत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता त्याचा मृतदेह पोलिस नियंत्रण कक्षात पडून होता. त्याचा चकमकीत मृत्यू झाला, एवढंच आम्हाला सांगण्यात आलं.

पोलिसांनी परस्पर पुरला मृतदेहअतहर त्याच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी जात असताना श्रीनगरजवळील लवेपोरा येथे झालेल्या चकमकीत इतर दोन तरुणांसह मारला गेला. बोर्डाच्या निकालानुसार अतहर त्याच्या शेवटच्या पेपरला गैरहजर होता. कुटुंबाचे म्हणणे आहे की, घर सोडल्यानंतर तीन तासांनंतर अतहरला चकमकीत मारण्यात आले. पोलिसांनी त्याचा मृतदेह सोनमर्ग येथे पुरला होता. पण, आजपर्यंत अतहरच्या वडिलांना त्याचा मृतदेह दिसला नाही.

दहशतवादी असल्याचा दावापरीक्षेच्या शेवटच्या पेपरआधी त्याची हत्या झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. ते सांगतात की, मी त्याच्या मृतदेहाची मागणी करून थकलो आहे, पण कोणी ऐकत नाही. ही चकमक झाली तेव्हा त्याबाबत पोलिसांची वेगवेगळी वक्तव्ये होती. यापूर्वी पोलिसांनी सांगितले होते की, चकमकीत मारले गेलेले तीन लोक पोलिस रेकॉर्डमध्ये दहशतवादी म्हणून सूचीबद्ध नाहीत. मात्र दोनच दिवसांनंतर पोलिसांनी हे तिघे दहशतवाद्यांचे साथीदार असल्याचा दावा केला.

अशाप्रकारची अनेक प्रकरणे आहेतपोलिसांनी सुनियोजित पद्धतीने चकमकीत मारल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. ठार झालेल्या तिघांपैकी एक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. या पद्धतीची आणखी प्रकरणे समोर आली असून, त्यातही मृतांच्या कुटुंबीयांना मृतदेह मिळाले नाहीत. आजही अनेक कुटुंबे मृतदेह मिळण्याची वाट पाहत आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस