शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Corona Vaccine: १ मेपासून लसीकरणासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक; अन्यथा लस मिळणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 17:32 IST

Corona Vaccine: कोरोना लसीकरणासाठी आता पूर्वनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात पूर्वनोंदणी बंधनकारक१८ ते ४५ या वयोगटातील पात्र व्यक्तींना पूर्वनोंदणीशिवाय लस नाहीकेंद्रीय आरोग्य सचिवांच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना

नवी दिल्ली: देशातील दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर आणि भयावह होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच कोरोनाच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. देशातील तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. मात्र, कोरोना लसीकरणासाठी आता पूर्वनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. (eligible beneficiaries age 18 to 45 years must do registration for corona vaccination)

संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मेपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात महत्त्वाचा सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 

केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन: देवेंद्र फडणवीस

कोरोना लसीकरणासाठी नोंदणी बंधनकारक

कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. मात्र, आता कोरोनाची लस घेण्यासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. १८ ते ४५ या वयोगटातील कोरोना लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या सर्वांना पूर्वनोंदणी आणि आगाऊ वेळ घेणे आवश्यक आहे. कोव्हिन किंवा आरोग्य सेतू अॅपवर सदर पूर्वनोंदणी करावयाची आहे. अन्यथा कोरोनाची लस दिली जाणार नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्यास मुभा देण्यात आली आहे. ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी हा नियम लागू नसेल, असेही सांगितले जात आहे. 

पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा

लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी

१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार असल्यामुळे कोरोना केंद्रावरील गर्दी वाढून व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ४५ वर्षांपर्यंतच्या पात्र सर्वांना कोव्हिन आणि आरोग्य सेतूवर पूर्वनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे पुढे होणारा गोंधळ टाळता येऊ शकेल, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार