शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

भारतात बनणार वीज अन् सीमेपार बसणार झटका! पाकिस्तानला पाण्यासाठी वणवण करायला लावणार 'हे' प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 11:15 IST

India Pakistan Tension : सिंधु पाणी करार स्थगित केल्यानंतर भारत सरकारने धरणे आणि जलविद्युत प्रकल्प बांधण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत सरकारने सिंधु करार स्थगित केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानात आधीच चिंतेचे वातावरण असताना आता शेजारी देशाला आणखी अडचणीत आणण्यासाठी भारताने पुढची पावले उचलली आहेत. सिंधु पाणी करार स्थगित केल्यानंतर भारत सरकारने धरणे आणि जलविद्युत प्रकल्प बांधण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या संबंधित मंत्रालये आणि इतर विभागांमध्ये बैठक झाली असून, त्यांना जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नियोजित जलविद्युत प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय असे अनेक नवे प्रकल्प सुरू करण्यावर जोर दिला जाणार आहे. सध्या यावर चर्चा सुरू असून, लवकरच त्या दिशेने पावले उचलली जाणार आहेत.

यासोबतच कोणते प्रकल्प लवकरात लवकर सुरू करता येतील याचा अहवाल सरकारने मागितला आहे. यादरम्यान,अशा १० नव्या प्रकल्पांची यादी तयार करण्यात आली असून, त्यावर सखोल अभ्यास केला जात आहे. यातील ५ प्रकल्पांना आधीच मंजूरी मिळाली आहे. तर, दोन प्रकल्पांसाठी लवकरच टेंडर काढले जाणार आहेत. झेलम नदीवर बनलेल्या उरी-१ या प्रकल्पाचा आणखी विस्तार केला जाणार आहे. यामुळे किशनगंगा नदीतून येणाऱ्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर केला जाईल. यासाठी पुढच्या आठवड्यात निविदा निघू शकतात. दोन महिन्यांपूर्वी पर्यावरण विभागाकडून मंजूरी मिळाल्यानंतर आता या प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू झाले आहे.

'या' प्रकल्पांच्या कामांना मिळणार गती!असे आणखी काही प्रोजेक्ट्स आहेत, ज्यावर जलद गतीने काम करण्याची तयारी सुरू झाली आहे. या प्रकल्पांमध्ये सिंध नाल्यावरील न्यू गांदरबल प्रकल्प, चिनाब नदीवरील किरतई २, रामबन आणि उधमपूरमधील दोन प्रकल्प देखील सामील आहेत. या सगळ्या प्रकल्पांमध्ये मिळून ३१०० मेगावॅट वीज तयार केली जाऊ शकते. परंतु, या सगळ्या कामांसाठी राज्य आणि केंद्र स्तरावर अनेक परवानग्या येणं बाकी आहे. मात्र, सध्या सरकारची या कामांप्रती गती पाहता, लवकरच कामे सुरू केली जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जम्मू-काश्मीर मधील प्रकल्पांना लवकरात लवकर मंजूरी देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र, यातील काही प्रकल्प अतिशय धोकादायक आणि दुर्गम भागात आहेत. याशिवाय सुरक्षेचा प्रश्न देखील आहे. परंतु, हे अडथळे कसे दूर करता येतील यावर देखील बैठक पार पडली आहे.     

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला