शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Elections: "आम्ही आता यांना हा खेळ खेळू देणार नाही"; अखिलेश यादवांचा कोणत्या गोष्टीला विरोध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 13:44 IST

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. अखिलेश यादव यांनीही आता सावध भूमिका घेतली आहे. 

Akhilesh Yadav Bihar Elections 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने विरोधकांना धक्का बसला आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएने बिहारमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप आणि नितीश कुमारांच्या जेडीयूनेच १७४ जागा जिंकल्या आहेत. या निकालावर बोलताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगाच्या दिशेने बोट दाखवले आहे. 

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव बिहारच्या निकालावर बोलताना SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेवर शंका उपस्थित केली आहे. एसआरआयमुळेच बिहारमध्ये हा खेळ झाला असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. हे आता पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले. 

अखिलेश यादव एसआरआयबद्दल काय बोलले?

सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, "बिहारमध्ये जो खेळ एसआरआयने केला आहे, तो पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी आता होणार नाही. कारण या निवडणूक कटाचा भांडाफोड झाला आहे. आता आम्ही हा खेळ यापुढे यांना (निवडणूक आयोग) खेळू देणार नाही. सीसीटीव्ही प्रमाणेच आमची पीपीटीव्ही म्हणजे पीडीए कार्यकर्ता सतर्क राहून भाजपचे मनसुबे हाणून पाडेल. भाजप पक्ष नाही छळ आहे", अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे. 

बिहारमध्ये भाजपने फक्त १२ जागा गमावल्या

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने १०१ जागा लढवल्या होत्या. भाजपला १२ जागांवरच पराभव स्वीकारावा लागला आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयूलाही मोठे यश मिळाले आहे. जेडीयूनेही १०१ जागा लढवल्या होत्या. त्यांनी ८५ जागा जिंकल्या आहेत. 

तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला फार चांगली कामगिरी करता आली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत ७५ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाला यावेळी फक्त २५ जागांवरच विजय मिळवता आला आहे. काँग्रेसनेही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत खराब कामगिरी केली आहे. १९ जागा काँग्रेसने २०२० मध्ये जिंकल्या होत्या. यावेळी फक्त ६ जागा काँग्रेसला जिंकता आल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Akhilesh Yadav Opposes Election Process; Alleges Foul Play in Bihar.

Web Summary : Akhilesh Yadav questions Bihar's election SIR process, alleging foul play. He vows to prevent this in West Bengal, Tamil Nadu, and Uttar Pradesh. He accuses BJP of manipulation, urging PDA workers to remain vigilant. BJP won 89 of 101 seats contested.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Akhilesh Yadavअखिलेश यादवElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी