शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

निवडणुकांपूर्वीच भाजपाने विजयाचं खातं उघडलं; दोन जागा जिंकल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 19:48 IST

देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत.

इटानगर - भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. अरुणाचल प्रदेशमधीलविधानसभा निवडणुकांध्ये भाजपाला हे यश मिळाले आहे. आलो ईस्ट आणि यचुली या दोन विधानसभा क्षेत्रातून भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. सर केंटो जिनी आणि ताबा तेडीर यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. याबाबत गृहराज्यमंत्री किरण जिजिजू यांनी ट्विट करुन माहिती दिली.  

देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. काँग्रेसने अरुणाचलमध्ये 53 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र, अरुणाचल प्रदेशमध्ये एकूण विधानसभा उमेदवारांसाठी 60 जागा आहेत. सध्या येथे भाजपाचे सरकार असून पेमा खांडू हे तेथील मुख्यमंत्री आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये 11 एप्रिल रोजी विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच भाजपाला एका जागेवर विजय मिळाला आहे. अरुणाचल प्रदेशमधील 31 आलो ईस्ट या विधानसभा मतदारसंघात भाजपाने बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. केंटो जिनी हे भाजपाचे उमेदवार या जागेवर निवडून आले आहेत. 

अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 मार्च होती. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत केंटो जिनी यांच्याविरुद्ध एकही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे कुठलाही उमेदवार विरुद्ध नसल्याने केंटो जिनी यांना विजयी घोषित करण्यात आले. अरुणाचल वेस्टचे खासदार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी मंगळवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. तर दुसरा उमेदवारही निवडून आल्याचं किरण रिजिजू यांनी सांगितलं. ताबा तेडीर हे दुसरे उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. 16 यचुली मतदारसंघात भाजपाला हा विजय मिळाला आहे. तेडीर यांच्याही विरुद्ध एकही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे भाजपाने या दोन जागेवर निवडणूक जिंकली आहे. दरम्यान, या निवडणुकांतील विजयाचा भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो.  

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMLAआमदारvidhan sabhaविधानसभाArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश